Sunday, June 08, 2008

Why Raw?

मागच्या एका पोस्टमधे मी Raw Food खात होते असा उल्लेख होता. त्यावर ब-याच लोकानी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तरे द्यायचा हा छोटासा प्रयत्न. ही मझी स्वत:ची मते आहे. तुम्हाला स्वत:वर यातले काहीही प्रयोग करायचे असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत. Mints याबाबतीत कशासही जबाबदार नाही.

मी David Wolfe या raw Foodist च्या सेमिनार ला गेले होते. त्याची यामागची भूमिका बरीचशी अशी आहे -

१. शाकाहार हाच मानवाचा मूळ आहार आहे. मानवाचे दात, सुळे, दाढा मांस भक्षणासाठी तयार झालेल्या नाहीत. तसेच शरिरात तयार होणारे पचनरस हे शाकाहारासाठी योग्य असेच तयार होतात. शाकाहार याचा अर्थ प्राणीजन्य पदार्थ जसे दूध, दूधापासुन तयार होणारे पदार्थ, मध, मासे, कोणत्याही प्रकारचे मांस हे शरीरास कोणतेही जीवनावश्यक घटक पुरवत नाही. Calcium, Vitamin D वगैरे घातलेले दूध बाजारात मिळते आणि ते शरीराला कसे चांगले आहे याचा बराच प्रचारही केलेला आढळतो. तसेच या प्राण्यांचे दूध आणि मांसासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीने torture केले जाते तो भागही किती un-humane आहे हे आपण संगीताच्या ब्लॉगमधे वाचले आहेच.

२. पदार्थ घेताना शक्यतो organic घ्यावेत. किटकनाशके, जंतुनाशके, अनेक प्रकारची रासायनीक खते वापरल्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळे यामधले बरेचसे जीवनावश्यक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळत नाहीत.

३. आधीच असा किटकनाशकांनी भरलेला, खतांवर वाढलेला भाजीपाला पुढे शिजवला तर त्यातली शिल्लक राहीलेली जीवनसत्वे नष्ट होतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याचा शरीरला पोषणाच्या द्रुष्टीने काहीही उपयोग होत नाही.

४. ११५ डिग्री फॅरेनहाईट्च्यापुढे तापवलेले अन्न हे शिजवलेले अन्न समजले जाते. या तापमानापर्यन्त कच्च्या पदार्थामधील घटकद्रव्ये टिकून रहातात.

५. कोणत्याही प्रकारचे तेल जर 'Expeller Process' ने काढले असेल तर त्यामधले जीवनसत्व टिकून रहाते. व्यावसायीक जे तेल काढले जाते ते 'solvent based extraction या पद्धतीने काढले जाते. या पद्धतीमधे बरीच हानिकारक द्रव्ये तेलामधे मिसळली जातात. त्यामुळे तेल दुकानामध्ये अनेक दिवस राहिले तरी खराब होत नाही. पण त्यामधे मिसळलेल्या अनेक प्रकारच्या stabilizers आणि solvents मुळे शरिराला अपाय होऊ शकतो.

६. या सर्व कारणांमुळे नैसर्गीकरित्या वाळवलेले पदार्थ जसे फळांच्या काप, वेगवेगळ्या तैलबीया खाणे हे शरिरासाठी अत्यंत पोषक समजले जाते.

७. बाजारात ज्याप्रकारचे चॉकलेट व कॉफी मिळते ती भाजलेली असल्यामुळे त्यातले उपयोगी घटकपदार्थ नष्ट झालेले असतात. त्यावर त्यात लोणी साखर मिसळल्यामुळे त्याच्यामुळे होणारी शरिराची हानी ही अनेकपटीनी अधीक असते.

८. मका, गहु, सोयाबीन हे धान्य पिकवताना खूप प्रकारची खते, किटकनाशके वापरली जातात. तसेच कापणी केल्यावर ते धान्य अधीक काळ टिकावे याकरिताही त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसींग होते. त्यामुळे या प्रकारच्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे शरिराला हानी पोहोचते.

यापुढेही जाऊन शरीरासाठी आवश्यक असणारे Calcium आम्ही कसे आणि मिळवायचे हा प्रश्न येतोच. त्यासाठी David Wolfe यांच्याकडून मिळालेले उत्तर याप्रमाणे - 'ब-याच पालेभाज्यांमधे आणि बदाम, आक्रोड यामधे शरीराला आवश्यक तेवढे calcium मिळते. वरून मिसळलेले calcium शरीरातून बाहेर टाकले जाते. त्यामुळे दूधामुळे शरीराला calcium मिळते हा समज चुकीचा आहे. '


याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. माझा याबद्दलचा अभ्यासही अतिशय तोकडा आहे. अधीक माहितीसाठी खालील पुस्तके वाचावीत -
Sunfood Diet Success System

The Raw Transformation: Energizing Your Life with Living Foods

Eating For Beauty

तुम्हाला जर कच्चे पदार्थ खायला सुरुवात करायची असेल तर प्रथम प्राणीजन्य पदार्थ खाणे बंद करावे. साखर, गूळ यासारखे पदार्थ बंद करावेत. त्यानन्तर शिजवलेले अन्न कमीकमी करत जाऊन कच्च्या पदार्थांचे जेवणातले प्रमाण वाढवत जावे. १००% बदल पहिल्यदिवशी करण्यापेक्षा हळुहळू केलेला बदल दीर्घकालीन यश देणारा असतो.

माझ्या Raw Recipes इथे मिळतील -
Mints' Raw Recipes

मी खालील पुस्तके रेसीपीसाठी वापरते -
Raw: The Uncook Book: New Vegetarian Food for Life
Raw