सध्या कराड मधे पावसाने नुसते थैमान घातलेय त्याचे फोटो पाहुन आणि मम्मी कडुन कहाण्या ऐकुन मला कराडमधे घालवलेले असंख्य पावसाळे आठवले.
प्राथमीक शाळेत असताना पाउस फार अवडायचा शाळा घरापसुन लांब होती आणि एखादे दिवशी रेनकोट विसरले तर मनसोक्त भिजायला मिळायचे. मम्मीचा ओरडा मिळायचा पण त्याचे फारसे काही वाटत नव्हते. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत भिजत यायचे. ते पावसाळ्याचे बूट नामक जो प्रकार मिळायचा त्याने माझ्या पायाची सालटी निघालेली असायची. त्यात माती जाउन झणझणायचे. पावसात सारखे खेळल्याने सर्दी खोकला असायचाच. बुचाची फुले वेचायची त्याचे गजरे करायचे. श्रावण तशातच यायचा. आमच्या त्या शाळेत नागोबाचे देऊळ होते. इतर दिवशी आम्ही त्या कट्ट्यावर खेळायचो. पण नागपंचमी दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मग सकाळी शाळेत पाटीपूजनाला जाउन यायचे. नारळ खोबरे चघळत रिमझिम पावसात भिजत घरी. संध्याकाळी परत नागोबाला जायचे. पावसाचा आणि नागपंचमीचा इतका अतूट संबंध होता की बास. पावसाळ्यात शाळा सुरु ह्वायची त्यामुळे ती पुस्तके न भिजता घरी यावित म्हणुन मग प्लास्टीकच्या पिशव्या असायच्या. पाटीसाठी अजून एक पिशवी - उतारा भिजुन पुसु नये.
त्याकाळात पाउस म्हणजे मजा वाटायची - पाउस आला की आनंद व्हायचा.
पाचवीमधे गेले तेव्हा हट्टाने छत्री मागुन घेतली. मग सायकल आल्यावर त्या छत्रीचे नखरे परवडेनासे झाले. ६वी ७वी मधे पाउस रोमांचक असतो वगैरे जाणवु लागलेले. मैत्रीणींबरोबर एका हातात सायकल आणि एका हातात छत्री घेउन खिदळत घरी यायचे. कॊलेजची पोरे मुद्दाम पाणी उडवुन जायची. पाटीपुजन वगैरे बंद झालेले. पावसाचे पाणी बघत बसायची खोड लागली.
७वीच्या वर्षात पावसाने हाहाकार माजवलेला... एका नवीन घरात भाड्याने रहात होतो. तिथे बाहेर पाऊस पडायचा तितकेच घरात गळायचे. मम्मीने वर्षाचे धान्य भरुन ठेवले होते ते सर्व भिजुन गेले. स्वत:च्या घरात जाणर म्हणुन आनंद मानायचा की घरातले अन्न धान्य नासधुस होताना पाहुन अश्रू गाळायचे या चिंतेत मम्मी पप्पा असायचे. सुबोध एकदा शाळेतुन घरी आला आणि मम्मी त्याला जेवायला वाढत होती तेवढ्यात इतका जोराचा पाउस आला की त्याला जेवायला सुद्धा मिळाले नाही. त्याक्षणाला मम्मीला काय वाटले असेल ते एक तीच जाणे! ... त्यावर्षी पावसाने डोळ्यातून पण पाऊस आणला ... एका महीन्यात प्रचंड नुकसान करुन गेला हा पाऊस. त्यावर्षी मात्र तो नकोसाच वाटला ...
तिथुन स्वत:च्या घरात आलो. आपले घर म्हणुन एक वेगळाच आनंद होता. आजुबाजुला सगळी शेतिच होती. शाळेला बसने जावे लागणार होते कारण तोपर्यंत मामासाहेबानी सायकल हरवलेली होती. शेतात राहयला आल्यामुळे आजुबाजुचे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहाताना पाहुन वेगळेच वाटायचे. गरम काळ्या मातीत पडलेला वळीवाचा पाऊस त्याचा तो खमंग वास अहाहा... शाळा सुरु होईपर्यंत मग असाच वळिव खिडकितुन बघत श्रीमानयोगी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली अशी एकामागोमाग एक पुस्तके वाचुन काढत वळीव काढला. शाळा सुरु व्हायचे दिवस आल्यावर मग शाळेच्या खरेदीबरोबर नविन पावसाळी चप्पल, नवीन छत्रीची खरेदी झालेली.
आणि शेतात घर असण्याचे तोटे पहिल्या शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या १५ दिवसातच समजले. घरापर्यंत जाण्यासाठी शेताच्या पाणदी मधुन रस्ता - गुडघा गुडघा चिखल असे करत बस गाठेपर्यंत कसरत व्हायची. मधे कॊलेज लागयचे तिथे चिखलाने बरबटलेले पाय धुवुन बस गाठायला पळायचे.
पावसाचा पूर्ण चार्म तिथेच संपला...
आज इथे बे एरीया मधे रहाताना पावसाळा म्हणले की आठवते ती तुफ़ान थंडी. नशीब एवढेच की बर्फ़ उकरावा लागत नाही. ऒफीसच्या खिडकितुन पाउस बघत माझी सहकारी अतिशय भावुक होते. मनात पावसात मनसोक्त भिजण्याची स्वप्ने पहाते. तिला पाहुन वाटते, आपल्याला हे सर्व Romantic का नाही वाटत? मग थोडावेळ विचार केल्यावर जाणवते अत्ता घरी असते तर मस्त पैकी हीटर लावुन पायावर शाल घेउन पुस्तक वाचत पडायला काय बहार येईल. एखाद्या वीकेन्ड ला ते स्वप्न सत्यात पण येते. माझ्या मनाने मी पावसाचा आनंद घेते.
असा एखादा दिवस मी अगदी मनापासुन मी पाउस enjoy करते पण बरेचदा त्याला पाहुन मनावर मळभ दाटुन येते, लहानपणीचे पावसाने वाया घालवलेले दिवस आठवतात ... वाईट वाटते पण मी त्याला माफ़ करुन पुढे चालु लागते ....
Tuesday, August 01, 2006
Friday, July 21, 2006
सोन्या
आज अचानक तुझी आठवण झाली. एका मित्राने विचारले तुझ्यकडे कुत्रा आहे का? पटकन उत्तर आले हमम हो! आणि एकदम आठवले तुला जाउन आता ९ वर्षे होतील. तु गेलास तेव्हा तुझ्या नजरेतले प्रेम कळले. घरातले तुझे सगळ्यात आवडते माणुस म्हणजे मम्मी. मी तशी नावडत्या माणसातच जमा तुझ्या दृष्टीने.
मला अजुन आठवते तुला अंजु पिशवीत घालुन घेउन आलेली. तुझा रंग काळा म्हणुन तू सुबोधला तर अजिबात आवडला नव्हतास. दिसायला आधीच्या राजा इतका काही तू देखणा नव्हतास पण चुणचुणीत मात्र नक्किच होतास. काही दिवसातच तुला समजले घरातले कोण प्रेम करते, कोण खाउ देते. मग मम्मी बाहेर गेली मंडईला कि तुझे रडणे चालू! नंतर नंतर तर मम्मी आंघोळीला गेली तरी तसेच. एकेदिवशी पप्पांचा राग अनावर जो झाला कि त्यांनी तुला काठीने मारले. मी सुबोध नको म्हणत असताना. मम्मी अंघोळिहुन आल्यावर तुझ्याकडे आली आणि म्हणाली, 'काय झाले माझ्या सोन्याला?' तुझ्या डोळ्यात चक्क पाणी होते रे. पण ह्या अनुभवातुन तु काही शिकलास का? तर नाही !!! तुझे रडणे तसेच चालु राहीले. सोन्या रडतोय म्हणजे मम्मी बाहेर गेली आहे ते सगळ्या सोसायटीला कळायचे! एकदा असेच मम्मी झोपली असताना तु अचानक रडू लागलास, तेव्हा आपल्या घरी यायला लागलेल्या एक काकु परत गेल्या का तर सोन्या रडतोय म्हणजे मम्मी घरात नाही!
मम्मीला आज्जीने एक तोंडलीचा वेल दिलेला लावयला. तो तिने लावला जिन्याशेजारी - पर्ययाने तुझ्या घराशेजारी. तो वाढुन त्याला तोंडली लागल्यावर ती तू कधी मटकावयला चालु केलीस ते आम्हाला कधी कळलेच नाही. तु असेपर्यंत त्या एकढ्या मोठ्या वेलाची तोंडली कधी म्हणुन आम्हला खायला मिळाली नाहीत. आणि तु गेल्यावर इतक्या टोपलीभर तोंडल्यांचे आता काय करायचे म्हाणुन तो वेलच मम्मीने आता काढुन टाकला. चपाती दिली कि नाखुष असणारा तू, शिरा केलेल्याचा वास आला की किती वर खाली उड्या मारायचास. घरात केलेला प्रत्येक गोड पदार्थ तुला मिळालेला आहे. दुध, चहा हे तुझे आवडीचे पदार्थ. मिटक्या मारत खालेल्ले श्रीखंड, करंजी, चिरोटे, बर्फ़्या आणी बरेच काही!
सोसायटीतला मोत्या आला की तुझा झालेला राग राग आठवला की हसु येते. तु १२ वर्षे होतास त्या १२ वर्षात सोसायटीमधे कुणाकडे कधीही चोरी झाली नाही. तुझा दबदबाच तेवढा होता.
पप्पांबरोबर फ़िरायला जाणे, मम्मीकडुन लाड करुन खाऊ खाणे, सुबोधकडुन लाड करुन घेणे आणि माझा राग राग करणे हा तुझा नेहमीचा दिवस. आयुष्यात तू फक्त एकदाच माणसाला चावलास आणि तो मनुष्यप्राणी म्हणजे मी! मी अंगण झाडण्यासाठी केरसुणी काढत होते तेव्हा बहुतेक मी तुला मारणारच आहे असे वाटले बहुदा, जे माझ्या हातातुन रक्त काढलेस की बास. आज मी जेव्हा त्या जखमेचा व्रण बघते, मला तु जिन्यावर वरखालीपळायचास तेच आठवते.
तू गेलास तेव्हा तुझ्या जीवाभावाची चारही माणसे तुझ्याशेजारी होती. त्यांच्याकडे प्रेमाने पहात तू प्राण सोडलास. तू गेलास आणि घरातल्या भाकर्यांची संख्या कमी झाली. पण कित्येक दिवस लक्षातच नाही यायचे तू आता नाहीस. तू घरीयेण्याआधी २ कुत्री सांभाळुन झालेली, पण तू गेलास आणि परत कुणाला घरी आणावेसे वाटलेच नाही. तुझी कमी भरुन काढणारे कुणी भेटेल असे वाटलेच नाही.
शोनु, तू आम्हाला काय दिलेस, खुप प्रेम, खुप सुरक्षीतता! आणि आमची आयुष्ये सम्रुद्ध करुन गेलास !!
ह्या आगळ्या मित्राच्या खुप आठवणी आज त्या मित्रामुळे जाग्या झाल्या, तुम्हा दोघानाही धन्यवाद!!
मला अजुन आठवते तुला अंजु पिशवीत घालुन घेउन आलेली. तुझा रंग काळा म्हणुन तू सुबोधला तर अजिबात आवडला नव्हतास. दिसायला आधीच्या राजा इतका काही तू देखणा नव्हतास पण चुणचुणीत मात्र नक्किच होतास. काही दिवसातच तुला समजले घरातले कोण प्रेम करते, कोण खाउ देते. मग मम्मी बाहेर गेली मंडईला कि तुझे रडणे चालू! नंतर नंतर तर मम्मी आंघोळीला गेली तरी तसेच. एकेदिवशी पप्पांचा राग अनावर जो झाला कि त्यांनी तुला काठीने मारले. मी सुबोध नको म्हणत असताना. मम्मी अंघोळिहुन आल्यावर तुझ्याकडे आली आणि म्हणाली, 'काय झाले माझ्या सोन्याला?' तुझ्या डोळ्यात चक्क पाणी होते रे. पण ह्या अनुभवातुन तु काही शिकलास का? तर नाही !!! तुझे रडणे तसेच चालु राहीले. सोन्या रडतोय म्हणजे मम्मी बाहेर गेली आहे ते सगळ्या सोसायटीला कळायचे! एकदा असेच मम्मी झोपली असताना तु अचानक रडू लागलास, तेव्हा आपल्या घरी यायला लागलेल्या एक काकु परत गेल्या का तर सोन्या रडतोय म्हणजे मम्मी घरात नाही!
मम्मीला आज्जीने एक तोंडलीचा वेल दिलेला लावयला. तो तिने लावला जिन्याशेजारी - पर्ययाने तुझ्या घराशेजारी. तो वाढुन त्याला तोंडली लागल्यावर ती तू कधी मटकावयला चालु केलीस ते आम्हाला कधी कळलेच नाही. तु असेपर्यंत त्या एकढ्या मोठ्या वेलाची तोंडली कधी म्हणुन आम्हला खायला मिळाली नाहीत. आणि तु गेल्यावर इतक्या टोपलीभर तोंडल्यांचे आता काय करायचे म्हाणुन तो वेलच मम्मीने आता काढुन टाकला. चपाती दिली कि नाखुष असणारा तू, शिरा केलेल्याचा वास आला की किती वर खाली उड्या मारायचास. घरात केलेला प्रत्येक गोड पदार्थ तुला मिळालेला आहे. दुध, चहा हे तुझे आवडीचे पदार्थ. मिटक्या मारत खालेल्ले श्रीखंड, करंजी, चिरोटे, बर्फ़्या आणी बरेच काही!
सोसायटीतला मोत्या आला की तुझा झालेला राग राग आठवला की हसु येते. तु १२ वर्षे होतास त्या १२ वर्षात सोसायटीमधे कुणाकडे कधीही चोरी झाली नाही. तुझा दबदबाच तेवढा होता.
पप्पांबरोबर फ़िरायला जाणे, मम्मीकडुन लाड करुन खाऊ खाणे, सुबोधकडुन लाड करुन घेणे आणि माझा राग राग करणे हा तुझा नेहमीचा दिवस. आयुष्यात तू फक्त एकदाच माणसाला चावलास आणि तो मनुष्यप्राणी म्हणजे मी! मी अंगण झाडण्यासाठी केरसुणी काढत होते तेव्हा बहुतेक मी तुला मारणारच आहे असे वाटले बहुदा, जे माझ्या हातातुन रक्त काढलेस की बास. आज मी जेव्हा त्या जखमेचा व्रण बघते, मला तु जिन्यावर वरखालीपळायचास तेच आठवते.
तू गेलास तेव्हा तुझ्या जीवाभावाची चारही माणसे तुझ्याशेजारी होती. त्यांच्याकडे प्रेमाने पहात तू प्राण सोडलास. तू गेलास आणि घरातल्या भाकर्यांची संख्या कमी झाली. पण कित्येक दिवस लक्षातच नाही यायचे तू आता नाहीस. तू घरीयेण्याआधी २ कुत्री सांभाळुन झालेली, पण तू गेलास आणि परत कुणाला घरी आणावेसे वाटलेच नाही. तुझी कमी भरुन काढणारे कुणी भेटेल असे वाटलेच नाही.
शोनु, तू आम्हाला काय दिलेस, खुप प्रेम, खुप सुरक्षीतता! आणि आमची आयुष्ये सम्रुद्ध करुन गेलास !!
ह्या आगळ्या मित्राच्या खुप आठवणी आज त्या मित्रामुळे जाग्या झाल्या, तुम्हा दोघानाही धन्यवाद!!
Saturday, July 01, 2006
माझे आवडते मित्र -
रजनीगंधा, आभार, मला पुस्तकाबद्दल लिहायची संधी दिल्याबद्दल.
घरामधे लहानपणापसुन पाहिलेली रेलचेल, पप्पानी दर महिन्याच्या पगारात घेतलेली पुस्तके! ह्या सगळ्याचा परीणाम म्हणा किंवा जन्मजात आवड म्हणा - पुस्तके हा एक माझा weakpoint. त्यातुनच झालेला हा एक प्रकार माझी पुस्तकांची आवड. पप्पा लायब्ररीअन होते आणि घरी पण प्रचंड पुस्तके विकत घ्यायचे. तीच आवड माझ्यात पण उतरली. आज माझे पुस्तकाचे मोठे कपाट वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाने भरलेले आहे. आजून बरीच पुस्तके विकत घ्यायची आहेत. बाहेर पाउस पडत आहे आणि हातात एक पुस्तक घेउन पायावर शाल टाकुन मी झोपुन पुस्तक वाचतेय - ही माझ्या आनंदाची परिसीमा आहे.
१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
भारतातुन येताना नेहेमी ४-५ तरी पुस्तके घेउन येतेच ह्यावर्षी आणलेल्यातले एक सुन्दर पुतक म्हणजे मिलींद बोकील यांचे शाळा.
२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
नववी इयत्तेतल्या मुलाचे विश्व. शाळेतले मित्र, त्यांची एक विशिष्ट भाषा. मुलींबद्दल आकर्षण. शाळेतल्या इतर गोष्टी. शिक्षक आणि शिक्षीका ना टोपणनावाने हाक मारणे वगैरे एकदम आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या करतात.
एक परत वाचलेले पुस्तक म्हणजे - माधवी देसाई यांचे नाच ग घुमा.
माधवी देसाईंची झालेली फरफट वाचताना कधी कधी असह्य होते. एका नामवंत माणसाची मुलगी, साध्या माणसाची पत्नी, एक विधवा, एका नामवंत माणसाची पत्नी, एक घटस्फोटीता त्यावर एक आई. पण त्यानी कुठेही कटुता आणलेली नाही. पहिल्यांदा वाचले तेव्हा काही आशय समजला नव्हता तो आता समजला.
अजुन वाचलेली पुस्तके म्हणजे - नातीचरामी, माणसांच्या गोष्टी, स्वत:विषयी, आप्त, शारदासंगीत,
३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
हे लिहिणे फारच अवघड आहे. हा blog मराठी म्हणुन मग फक्त मराठी पुस्तकांची नावे देतेय. खाली दिलेली पुस्तकांची नावे देताना हे लिहू की ते लिहू असे झालेले. मला स्वत:ला चरित्र, आत्मचरित्र हे प्रकार वाचायला फ़ार आवडतात. तरी खाली वेगवेगळ्या गटातील पुस्तके द्यायचा प्रयत्न करते.
१. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
२. शारदासंगीत - प्रकाश संत
३. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
४. स्थलांतर - सानिया
५. बापलेकी - पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर
नेहेमी वाचनात असणारी पुस्तके म्हणजे - गौरी देशपांडेंची विंचुर्णीचे धडे, मुक्काम, सगळीच म्हणायला हरकत नाही. अनिल अवचटांचे स्वत:विषयी तर एकदम साधेसुधे - त्यांच्यासारखेच कुठेही मुखवटा नसलेले. प्रकाश संत यांची चारही पुस्तके.
४) अजुन वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१. आम्ही आणि आमचा बाप
२. संभाजी
३. माझा साक्षात्कारी हृदयरोग
४. मृद्गंध
५. नेताजी
ही पण यादी न संपणारी आहे. ह्यातली बरीचशी पुस्तके येताना आणलेली आहेत पण वाचन करणे बाकी आहे.
५) एका प्रिय पुस्तकाविशयी थोडेसे:
मला सुनीताबाईंचे आहे मनोहर तरी फार आवडणारे पुस्तक. पुलंच्या व्यक्तीमत्वाखली त्या दडून गेल्या नाहीत. पैसे टाकून करता येण्याजोगी कामे स्वत: केली, ४२ च्या चळवळीत कामे केली पण त्यात वाहुन नाही गेल्या. एखाद्या गोष्टीत तन-मन-धन अर्पून अलिप्त रहाणे अतिशय अवघड - ते त्यांना जमले.
मी ज्यांचे blogs नेहेमी वाचते अश्यानी आधीच लिहुन झालेय तरी पण दोघाना Tag करतेच -
यतीन
अतुल
घरामधे लहानपणापसुन पाहिलेली रेलचेल, पप्पानी दर महिन्याच्या पगारात घेतलेली पुस्तके! ह्या सगळ्याचा परीणाम म्हणा किंवा जन्मजात आवड म्हणा - पुस्तके हा एक माझा weakpoint. त्यातुनच झालेला हा एक प्रकार माझी पुस्तकांची आवड. पप्पा लायब्ररीअन होते आणि घरी पण प्रचंड पुस्तके विकत घ्यायचे. तीच आवड माझ्यात पण उतरली. आज माझे पुस्तकाचे मोठे कपाट वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाने भरलेले आहे. आजून बरीच पुस्तके विकत घ्यायची आहेत. बाहेर पाउस पडत आहे आणि हातात एक पुस्तक घेउन पायावर शाल टाकुन मी झोपुन पुस्तक वाचतेय - ही माझ्या आनंदाची परिसीमा आहे.
१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
भारतातुन येताना नेहेमी ४-५ तरी पुस्तके घेउन येतेच ह्यावर्षी आणलेल्यातले एक सुन्दर पुतक म्हणजे मिलींद बोकील यांचे शाळा.
२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
नववी इयत्तेतल्या मुलाचे विश्व. शाळेतले मित्र, त्यांची एक विशिष्ट भाषा. मुलींबद्दल आकर्षण. शाळेतल्या इतर गोष्टी. शिक्षक आणि शिक्षीका ना टोपणनावाने हाक मारणे वगैरे एकदम आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या करतात.
एक परत वाचलेले पुस्तक म्हणजे - माधवी देसाई यांचे नाच ग घुमा.
माधवी देसाईंची झालेली फरफट वाचताना कधी कधी असह्य होते. एका नामवंत माणसाची मुलगी, साध्या माणसाची पत्नी, एक विधवा, एका नामवंत माणसाची पत्नी, एक घटस्फोटीता त्यावर एक आई. पण त्यानी कुठेही कटुता आणलेली नाही. पहिल्यांदा वाचले तेव्हा काही आशय समजला नव्हता तो आता समजला.
अजुन वाचलेली पुस्तके म्हणजे - नातीचरामी, माणसांच्या गोष्टी, स्वत:विषयी, आप्त, शारदासंगीत,
३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
हे लिहिणे फारच अवघड आहे. हा blog मराठी म्हणुन मग फक्त मराठी पुस्तकांची नावे देतेय. खाली दिलेली पुस्तकांची नावे देताना हे लिहू की ते लिहू असे झालेले. मला स्वत:ला चरित्र, आत्मचरित्र हे प्रकार वाचायला फ़ार आवडतात. तरी खाली वेगवेगळ्या गटातील पुस्तके द्यायचा प्रयत्न करते.
१. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
२. शारदासंगीत - प्रकाश संत
३. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
४. स्थलांतर - सानिया
५. बापलेकी - पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर
नेहेमी वाचनात असणारी पुस्तके म्हणजे - गौरी देशपांडेंची विंचुर्णीचे धडे, मुक्काम, सगळीच म्हणायला हरकत नाही. अनिल अवचटांचे स्वत:विषयी तर एकदम साधेसुधे - त्यांच्यासारखेच कुठेही मुखवटा नसलेले. प्रकाश संत यांची चारही पुस्तके.
४) अजुन वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१. आम्ही आणि आमचा बाप
२. संभाजी
३. माझा साक्षात्कारी हृदयरोग
४. मृद्गंध
५. नेताजी
ही पण यादी न संपणारी आहे. ह्यातली बरीचशी पुस्तके येताना आणलेली आहेत पण वाचन करणे बाकी आहे.
५) एका प्रिय पुस्तकाविशयी थोडेसे:
मला सुनीताबाईंचे आहे मनोहर तरी फार आवडणारे पुस्तक. पुलंच्या व्यक्तीमत्वाखली त्या दडून गेल्या नाहीत. पैसे टाकून करता येण्याजोगी कामे स्वत: केली, ४२ च्या चळवळीत कामे केली पण त्यात वाहुन नाही गेल्या. एखाद्या गोष्टीत तन-मन-धन अर्पून अलिप्त रहाणे अतिशय अवघड - ते त्यांना जमले.
मी ज्यांचे blogs नेहेमी वाचते अश्यानी आधीच लिहुन झालेय तरी पण दोघाना Tag करतेच -
यतीन
अतुल
Thursday, May 11, 2006
जेव्हा तिची नी माझी रानात भेट झाली ...
१० वी ची पूर्व परीक्षा चालु होती. दुसरा दिवस - इंग्लिश आणि जीवशास्त्र असे २ पेपर होते. मी आणि अंजु नेहेमीप्रमाणे अगदी १२ वाजायला शाळा भरायची तर ११.४५ ला घरातुन निघालेलो. पेपरची धाकधुक होतीच. त्यातुन पाणंदीतुन जाणारा म्हशींचा कळप दिसला. मी थांबले आणि अंजुला म्हणाले आता आपल्याला पोचायला नक्कीच उशीर होणार. ती म्हणाली काही नाही होत उशीर. आणि तिने स्वत:ची सायकल तशीच त्या म्हशींच्यामधुन दामटवली. आणि ती त्या कळपाच्या दुसर्या टोकाला जावुन माझी वाट पहात उभी राहीली. मी घाबरत घाबरत माझी सायकल म्हशींच्या घोळक्यात घातली आणि दोन म्हशींचे जे काय भांडण लागले म्हणता!! नळावर कशा बायका एकमेकींच्या अंगावर धावुन जातात अगदी तस्सेच एक म्हैस दुसरीच्या अंगावर गेली की धावुन. तिला बापडीला काय पडलेले की मनुष्य नामक एका प्राण्याचे एक छोटे पिल्लु सायकल नामक वहानावर बसुन तिथुन जातय. तिने जी ढुशी मारली म्हणता!! मला हलकासा (??)धक्का देउन तिने तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला. दुसरी बाई थोडीच गप्प बसणार आहे? तिने लगेच उलट धक्का मारला. ह्या सगळ्या हलक्या धक्क्यांचा परीणाम म्हणून मी एकदम पाणंदीच्या कडेला झाडात जाउन पडलेले. त्या नादात माझा चष्मा सुरक्षीत ठेवु शकले. तोपर्यंत म्हशीवाले काका आले ते सोडवायला. अंजु आली माझी सायकल दोघानी मिळुन उचलली. अंगाला असह्य वेदना होत होत्या. शाळेचा ड्रेस चिखलाने भरलेला. सायकलचे चाक वाकडे झालेले. घर ३ मिनिटावर होते पण ह्या प्रकारात आधीच ७ मिनिटे वाया गेलेली. परीक्षेची जाणीव झाली आणि मग तसाच आमचा मोर्चा शाळेकडे वळवला. १० मिनिटे उशिर झाला, नुकतीच प्रार्थना संपलेली पण पेपर सुरु नव्हता झालेला. मुख्याध्यापकाना सगळे सांगितले आणि पेपर ला गेले. दुपारच्या सुट्टीत उजळणी करण्याऐवजी माझ्यावर उद्भवलेल्या प्रसंगाची उजळणी, शहानीशा आणि उहापोह वगैरे झाला. टिंगल टवाळी न करतील त्या कन्याशाळेतल्या १०वी अ च्या विद्यार्थीनी कसल्या ....
अशी झालेली ती अविस्मरणीय भेट आज तुमच्या भेटिला आणलीय.
अशी झालेली ती अविस्मरणीय भेट आज तुमच्या भेटिला आणलीय.
Wednesday, May 10, 2006
भाकरीचा चंद्र
मी ५ वी किंवा ६ वी मधे असतानाची गोष्ट. मम्मी पुण्याला काकुकडे गेलेली १ महिना कारण तिला बरे नव्हते. आमच्यासाठी डबा गावात रहाणारी मामी पाठवेल असे ठरलेले. पण मामीला काही ना काही कारणाने डबा पाठवायला नेहेमी उशीर. मग पप्पांचे भातचे प्रयोग चालायचे. नाहीतर मग शेजारी रहाणारी मम्मीची मैत्रीण काहितरी पाठवुन द्यायची.
मम्मी परत आल्यावर तिला हे समजल्यावर मग काय तिने मला स्वयंपाक शिकवायचे जे काय मनात घेतले कि बासच. भाजीसाठी कांदा चिरुन देणे, भाजी निवडुन/चिरुन देणे ह्या गोष्टी आठवड्यातुन २-३ वेळा तरी कराव्याच लागायच्या. मग ते नीट जमायला लागले, आणि मग भाज्या फोडणी पण द्यायला यायला लागल्या. तोपर्यन्त आली उन्हाळ्याची सुट्टी.
मग मातोश्रीनी आम्हाला भाकरी शिकवायचे मनावर घेतले. आधी स्वत: भाकरी करत असताना त्यातला शेवटचा गोळा मला ठेवुन त्याच्यावर प्रयोग. मातोश्री एक्दम कडक शिस्तिच्या आणि घरात भाकरी अगदी पातळ पातळ करायची सवय असल्याने प्रचंड शाब्दिक मारामारी व्हायची. मग गंगा, यमुना सरस्वती यांचा संगम अस्मादिकांच्या चेहेर्यावर व्हायचा. असे करत करत १०-१२ दिवसानी एकदा कधीतरी भाकरी बरी थापली गेली - आकार होता कसा बसा ४-५ इंच व्यासाइतका. एकदम आनंदाचे उधाण वगैरे जे काही असेल ते आले. मग मातोश्रींच्या कडक शिस्तीखाली तो रोट (हो रोटच होता तो) भाजायचा प्रयोग झाला. हे करता करता काही दिवसात बर्यापैकी पातळ आणि कशाबशा फ़ुगणार्या भाकऱ्या तयार व्हायला लागल्या.
तष्यात कधितरी मग मम्मीला बाहेर कुठेतरी अचानक जावे लागले आणि मग अस्मादिकान्ची नेमणुक झाली भाकरी करण्याच्या कमगिरीवर. मग बाहेर जाताना मम्मीने मग १७६० सुचना दिल्या आणि ती गेली बाहेर. मग काय भावाबरोबर मस्ती झाली, भांडण झाले बराच काय काय उद्योग करुन झाला आणि मग लक्शात आले की भाकर्या राहिल्याच की करायच्या !! मग काय पटापट तयारी केली आणि बसले भाकर्या करायला. पहीली भाकरी थापुन तव्यावर टाकली पाणी लावले आणि दुसरी करायला घेतली. ती करुन तव्याकडे बघते तर तव्यातल्या भाकरीला असंख्य भेगा पडलेल्या. तरी दामटुन ती उलटली आणि थोडावेळ भाजुन मग तवा काढुन आचेवर भाकरी टाकली आणि आता फ़ुगेल मग फ़ुगेल असे वाटले. थोड्यावेळात त्याअतुन धुर यायला लागला. मग तई कोळसा झालेली, भेगा पडलेली भाकरी काढुन बाजुला ठेवली आणि परातीतली भाकरी तव्यात टाकली. मग ठरवले की ही भाकरी पूर्ण झाल्याशिवाय पुढची करायचीच नाही. मग ती भाकरी उलटताना मधेच तुटली - ती कशीबशी सांधवली. त्या भाकरीचे पण फुगायचे काही लक्शण दिसेना मग ती पण ठेवली टोपलीत काढुन. मग पुढची थापायला घेतली तर थापयलच जमेना. मग मोडुन परत करुन तिला तव्यावर टाकली तर तोपर्यन्त तवा इतका तापलेला की तिला अचानक फ़ुगे फ़ुगे आले. कशीबशी शेवटच्या टप्यापर्यंत नेली तिला पण तिनेही फ़ुगायचे नाकारले. मग परत गंगा यमुना सरस्वती आल्या धावुन संगमासाठी. पण कसचे काय त्या मदत थोड्याच करणार होत्या मला. फ़क्त साथ देणार होत्या. तेवढ्यात डोक्यात आयडीयेची कल्पना आली - सगळ्या भाकर्या उचलल्या आणि घरामागे असलेल्या उसाच्या शेतात टाकुन पटकन पुढची भाकरी करायला घेतली. ती जरा बरी झाली. तोपर्यंत लैलाच्या आई, ज्या अमच्याकडे भांडी धुणी करायच्या त्या आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली उरलेल्या भाकर्या बर्यापैकी झाल्या. त्यादिवशी ८-९ भाकरी करायला मला जवळपास २ तास लागले आणि त्यातल्या ३ तर शेताला दान गेल्या.
त्या आठवड्यात मम्मीला परत कामासाठी कुठेतरी जावे लागले त्यावेळी पण वरची जवळपास सगळ्या क़ृतीची उजळणी झाली. शेताला २ भाकर्या अर्पण करण्यात आल्या. असे करत करत शेतला एकुण ८-९ भाकर्यादन गेल्या त्या आठवड्यात!
हे सांगणे न लगे की मम्मीला त्या आठवड्यात २ दिवस लवकरच दळण करवे लागले...
मम्मी परत आल्यावर तिला हे समजल्यावर मग काय तिने मला स्वयंपाक शिकवायचे जे काय मनात घेतले कि बासच. भाजीसाठी कांदा चिरुन देणे, भाजी निवडुन/चिरुन देणे ह्या गोष्टी आठवड्यातुन २-३ वेळा तरी कराव्याच लागायच्या. मग ते नीट जमायला लागले, आणि मग भाज्या फोडणी पण द्यायला यायला लागल्या. तोपर्यन्त आली उन्हाळ्याची सुट्टी.
मग मातोश्रीनी आम्हाला भाकरी शिकवायचे मनावर घेतले. आधी स्वत: भाकरी करत असताना त्यातला शेवटचा गोळा मला ठेवुन त्याच्यावर प्रयोग. मातोश्री एक्दम कडक शिस्तिच्या आणि घरात भाकरी अगदी पातळ पातळ करायची सवय असल्याने प्रचंड शाब्दिक मारामारी व्हायची. मग गंगा, यमुना सरस्वती यांचा संगम अस्मादिकांच्या चेहेर्यावर व्हायचा. असे करत करत १०-१२ दिवसानी एकदा कधीतरी भाकरी बरी थापली गेली - आकार होता कसा बसा ४-५ इंच व्यासाइतका. एकदम आनंदाचे उधाण वगैरे जे काही असेल ते आले. मग मातोश्रींच्या कडक शिस्तीखाली तो रोट (हो रोटच होता तो) भाजायचा प्रयोग झाला. हे करता करता काही दिवसात बर्यापैकी पातळ आणि कशाबशा फ़ुगणार्या भाकऱ्या तयार व्हायला लागल्या.
तष्यात कधितरी मग मम्मीला बाहेर कुठेतरी अचानक जावे लागले आणि मग अस्मादिकान्ची नेमणुक झाली भाकरी करण्याच्या कमगिरीवर. मग बाहेर जाताना मम्मीने मग १७६० सुचना दिल्या आणि ती गेली बाहेर. मग काय भावाबरोबर मस्ती झाली, भांडण झाले बराच काय काय उद्योग करुन झाला आणि मग लक्शात आले की भाकर्या राहिल्याच की करायच्या !! मग काय पटापट तयारी केली आणि बसले भाकर्या करायला. पहीली भाकरी थापुन तव्यावर टाकली पाणी लावले आणि दुसरी करायला घेतली. ती करुन तव्याकडे बघते तर तव्यातल्या भाकरीला असंख्य भेगा पडलेल्या. तरी दामटुन ती उलटली आणि थोडावेळ भाजुन मग तवा काढुन आचेवर भाकरी टाकली आणि आता फ़ुगेल मग फ़ुगेल असे वाटले. थोड्यावेळात त्याअतुन धुर यायला लागला. मग तई कोळसा झालेली, भेगा पडलेली भाकरी काढुन बाजुला ठेवली आणि परातीतली भाकरी तव्यात टाकली. मग ठरवले की ही भाकरी पूर्ण झाल्याशिवाय पुढची करायचीच नाही. मग ती भाकरी उलटताना मधेच तुटली - ती कशीबशी सांधवली. त्या भाकरीचे पण फुगायचे काही लक्शण दिसेना मग ती पण ठेवली टोपलीत काढुन. मग पुढची थापायला घेतली तर थापयलच जमेना. मग मोडुन परत करुन तिला तव्यावर टाकली तर तोपर्यन्त तवा इतका तापलेला की तिला अचानक फ़ुगे फ़ुगे आले. कशीबशी शेवटच्या टप्यापर्यंत नेली तिला पण तिनेही फ़ुगायचे नाकारले. मग परत गंगा यमुना सरस्वती आल्या धावुन संगमासाठी. पण कसचे काय त्या मदत थोड्याच करणार होत्या मला. फ़क्त साथ देणार होत्या. तेवढ्यात डोक्यात आयडीयेची कल्पना आली - सगळ्या भाकर्या उचलल्या आणि घरामागे असलेल्या उसाच्या शेतात टाकुन पटकन पुढची भाकरी करायला घेतली. ती जरा बरी झाली. तोपर्यंत लैलाच्या आई, ज्या अमच्याकडे भांडी धुणी करायच्या त्या आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली उरलेल्या भाकर्या बर्यापैकी झाल्या. त्यादिवशी ८-९ भाकरी करायला मला जवळपास २ तास लागले आणि त्यातल्या ३ तर शेताला दान गेल्या.
त्या आठवड्यात मम्मीला परत कामासाठी कुठेतरी जावे लागले त्यावेळी पण वरची जवळपास सगळ्या क़ृतीची उजळणी झाली. शेताला २ भाकर्या अर्पण करण्यात आल्या. असे करत करत शेतला एकुण ८-९ भाकर्यादन गेल्या त्या आठवड्यात!
हे सांगणे न लगे की मम्मीला त्या आठवड्यात २ दिवस लवकरच दळण करवे लागले...
Sunday, March 26, 2006
माणसामाणसातला फरक
ही आठवण देखील मी कोल्हापुरला असतानाची ...
M. Sc. ला शिवाजी विद्यापिठात होते. तिथल्या मराठी विषयाच्या कुलकर्णी नावाच्या एका प्राध्यापकाना ज्ञानेश्वरीची सर्वात जुनी प्रत मिळालेली. त्याचे त्यांनी संपादन केले होते. त्या ज्ञानेश्वरीचा प्रकाशन समारंभ होता. त्या कार्यक्रमाला श्री. बाबामहाराज सातारकर आणि न्यायमुर्ती यशवंतराव चंद्रचुड हे आलेले. बाबामहाराजांचे ज्ञानेश्वरीतील एका ओवीवर किर्तन झाले. त्यानंतर न्यायमुर्तीनी पण ज्ञानेश्वरीवर थोडक्यात निरुपण केले. त्यादिवशी प्रथम मला कळले की त्यांचा पण ज्ञानेश्वरीचा किती अभ्यास आहे.
कार्यक्रम संपला आणि व्यासपिठावरुन सांगितले गेले की न्यायमुर्ती आणि बाबामहाराज आता लोकाना स्वाक्षरी देतील. त्यावेळी सुवर्ण ज्ञानेश्वरी वगैरे चाललेले. मला त्यावेळी जरा स्वाक्षर्या गोळा करायची सवय होती. माझा नंवर आल्यावर मी त्या खोलीत गेले. मी पहिल्यांदा बाबामहाराजांच्यासओर उभी राहीले. ते म्हणाले, 'माझी स्वाक्षरी हवी असेल तर माळ घालावी लागेल आणि सुवर्ण ज्ञानेश्वरीसाठी देणगी द्यावी लागेल.' मी त्यांना म्हणाले, 'मी मांसाहार आणि मद्यपान करत नाही तर मी माळ घातली आणि नाही घातली तरी काय फरक पडतो.' ते म्हणाले, 'माझा नियम आहे स्वाक्षरी हवी असेल तर हे करावेच लागेल!' मी तिथुन निघाले. न्यायमुर्ती मला म्हणाले, 'बाळ! इकडे ये.' मी त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, 'माझी चालेल का स्वाक्षरी चालेल का?' मला एकदम आनंद झाला आणि मी त्यांच्यापुढे माझी वही पुढे केली. त्यांनी मला माझे नाव विचारले, मी सांगितले. माझे नाव थोडे वेगळे असल्याने त्यांनी अर्थ विचारला, मी सांगितला. त्यांनी वहीवर माझे नाव लिहीले आणि खाली लिहिले 'मोठी हो.'
त्यांना नमस्कार करुन मी तिथुन निघाले. मला दोन माणसांनी दिलेल्या वागणुकीवरुन माणसामाणसातला फरक कळला.
M. Sc. ला शिवाजी विद्यापिठात होते. तिथल्या मराठी विषयाच्या कुलकर्णी नावाच्या एका प्राध्यापकाना ज्ञानेश्वरीची सर्वात जुनी प्रत मिळालेली. त्याचे त्यांनी संपादन केले होते. त्या ज्ञानेश्वरीचा प्रकाशन समारंभ होता. त्या कार्यक्रमाला श्री. बाबामहाराज सातारकर आणि न्यायमुर्ती यशवंतराव चंद्रचुड हे आलेले. बाबामहाराजांचे ज्ञानेश्वरीतील एका ओवीवर किर्तन झाले. त्यानंतर न्यायमुर्तीनी पण ज्ञानेश्वरीवर थोडक्यात निरुपण केले. त्यादिवशी प्रथम मला कळले की त्यांचा पण ज्ञानेश्वरीचा किती अभ्यास आहे.
कार्यक्रम संपला आणि व्यासपिठावरुन सांगितले गेले की न्यायमुर्ती आणि बाबामहाराज आता लोकाना स्वाक्षरी देतील. त्यावेळी सुवर्ण ज्ञानेश्वरी वगैरे चाललेले. मला त्यावेळी जरा स्वाक्षर्या गोळा करायची सवय होती. माझा नंवर आल्यावर मी त्या खोलीत गेले. मी पहिल्यांदा बाबामहाराजांच्यासओर उभी राहीले. ते म्हणाले, 'माझी स्वाक्षरी हवी असेल तर माळ घालावी लागेल आणि सुवर्ण ज्ञानेश्वरीसाठी देणगी द्यावी लागेल.' मी त्यांना म्हणाले, 'मी मांसाहार आणि मद्यपान करत नाही तर मी माळ घातली आणि नाही घातली तरी काय फरक पडतो.' ते म्हणाले, 'माझा नियम आहे स्वाक्षरी हवी असेल तर हे करावेच लागेल!' मी तिथुन निघाले. न्यायमुर्ती मला म्हणाले, 'बाळ! इकडे ये.' मी त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, 'माझी चालेल का स्वाक्षरी चालेल का?' मला एकदम आनंद झाला आणि मी त्यांच्यापुढे माझी वही पुढे केली. त्यांनी मला माझे नाव विचारले, मी सांगितले. माझे नाव थोडे वेगळे असल्याने त्यांनी अर्थ विचारला, मी सांगितला. त्यांनी वहीवर माझे नाव लिहीले आणि खाली लिहिले 'मोठी हो.'
त्यांना नमस्कार करुन मी तिथुन निघाले. मला दोन माणसांनी दिलेल्या वागणुकीवरुन माणसामाणसातला फरक कळला.
Friday, March 24, 2006
अरुंधती -- एक मैत्रीण
मी २ री किंवा ३ री मधे असतानाची गोष्ट. शाळेमधे माझी आवडती मैत्रीण हा निबंध लिहुन आणायला सांगितला होता. त्यावेळी आवडती मैत्रीण म्हणजे शेजारी बसणारी मुलगी हे समिकरण होते. म्हणुन मग मी माझ्या वैशाली नावाच्या मैत्रीणीवर निबंध लिहायला सुरुवात केली. पण तिचे केस मोठे आहेत, ती मला खुप आवडते आणि अशीच २ - ३ वाक्ये लिहीली आणि मी मम्मीकडे गेले - मला आता पुढे काहीतरी सांग म्हणत. ती म्हणाली, मला तुझी वैशाली कोण ते कुठे माहीती आहे. मग थोदी चिडचिड झाली आणि मी रुसुन दुसरा अभ्यास सुरु केला. सकाळी शाळेत जाण्याअगोदर परत आठवण झाली कि निबंध लिहायचा आहे. परत मम्मीच्या मागे लकडा. मग मम्मी म्हणाली, मी सांगते ते लिहिणार असशील न रडता तर सांगते. तिने सांगायला सुरुवात केली - माझ्या आवडत्या मैत्रीणीचे नाव अरुंधती पुढे असेच काही काही. शाळेतल्या निबंधाचे काम झाले म्हणुन मी खुष होण्याचे सोडुन हे केवढे मोठे नाव, मला ह्या नावाची मुलगी पण माहीती नाही हेच विचार डोक्यात. पण का कुणास ठावुक ते नाव मात्र माझ्या डोक्यात बसले.
पुढे मी अमेरीकेमधे M. S. करताना मला एक मैत्रीण मिळाली - अरुंधती !! पण तोपर्यंत हा प्रसंग माझ्या पूर्ण विस्मरणात गेला होता. आता ती आणि मी खुप चांगल्या मैत्रीणी आहोत. परवा घरुन office ला येता येता मला वरचा प्रसंग आठवला. काही काही प्रसंग भविष्याची नांदी असतात का?
पुढे मी अमेरीकेमधे M. S. करताना मला एक मैत्रीण मिळाली - अरुंधती !! पण तोपर्यंत हा प्रसंग माझ्या पूर्ण विस्मरणात गेला होता. आता ती आणि मी खुप चांगल्या मैत्रीणी आहोत. परवा घरुन office ला येता येता मला वरचा प्रसंग आठवला. काही काही प्रसंग भविष्याची नांदी असतात का?
Subscribe to:
Posts (Atom)