आजकाल मराठी लिहिताना त्रास होतो अशी ओरड ऎकली आणि मनाशी म्हाणाले - आपले असे नको व्हायला. तरी मायबोली वर बरेचदा मराठीतच लिहिले जाते. अलीकडे तरी जास्तीच. पण घरी पत्रे पाठवणे थांबलेच जवळजवळ. असे कधी झाले नक्की आठवायचा प्रयत्न केला तर असे आठवतेय की - रोजच्या आयुष्यातल्या चाकोरीतुन खुप गोष्टी घरी सांगु नयेत ह्या कारणामुळे पत्रे फ़ारच त्रोटक व्हायला लागली आणि कधितरी थांबलीच.
आता पत्र लिहीतच नाही त्यामुळे मराठी अक्षराचा काय निकाल लागलाय ते पहावेच लागेल एकदा!! पण टंकलेखीत मराठी जपुन रहावे म्हणुन हा प्रपंच.
~मिनु.
1 comment:
स्वागत!
Post a Comment