आज अचानक तुझी आठवण झाली. एका मित्राने विचारले तुझ्यकडे कुत्रा आहे का? पटकन उत्तर आले हमम हो! आणि एकदम आठवले तुला जाउन आता ९ वर्षे होतील. तु गेलास तेव्हा तुझ्या नजरेतले प्रेम कळले. घरातले तुझे सगळ्यात आवडते माणुस म्हणजे मम्मी. मी तशी नावडत्या माणसातच जमा तुझ्या दृष्टीने.
मला अजुन आठवते तुला अंजु पिशवीत घालुन घेउन आलेली. तुझा रंग काळा म्हणुन तू सुबोधला तर अजिबात आवडला नव्हतास. दिसायला आधीच्या राजा इतका काही तू देखणा नव्हतास पण चुणचुणीत मात्र नक्किच होतास. काही दिवसातच तुला समजले घरातले कोण प्रेम करते, कोण खाउ देते. मग मम्मी बाहेर गेली मंडईला कि तुझे रडणे चालू! नंतर नंतर तर मम्मी आंघोळीला गेली तरी तसेच. एकेदिवशी पप्पांचा राग अनावर जो झाला कि त्यांनी तुला काठीने मारले. मी सुबोध नको म्हणत असताना. मम्मी अंघोळिहुन आल्यावर तुझ्याकडे आली आणि म्हणाली, 'काय झाले माझ्या सोन्याला?' तुझ्या डोळ्यात चक्क पाणी होते रे. पण ह्या अनुभवातुन तु काही शिकलास का? तर नाही !!! तुझे रडणे तसेच चालु राहीले. सोन्या रडतोय म्हणजे मम्मी बाहेर गेली आहे ते सगळ्या सोसायटीला कळायचे! एकदा असेच मम्मी झोपली असताना तु अचानक रडू लागलास, तेव्हा आपल्या घरी यायला लागलेल्या एक काकु परत गेल्या का तर सोन्या रडतोय म्हणजे मम्मी घरात नाही!
मम्मीला आज्जीने एक तोंडलीचा वेल दिलेला लावयला. तो तिने लावला जिन्याशेजारी - पर्ययाने तुझ्या घराशेजारी. तो वाढुन त्याला तोंडली लागल्यावर ती तू कधी मटकावयला चालु केलीस ते आम्हाला कधी कळलेच नाही. तु असेपर्यंत त्या एकढ्या मोठ्या वेलाची तोंडली कधी म्हणुन आम्हला खायला मिळाली नाहीत. आणि तु गेल्यावर इतक्या टोपलीभर तोंडल्यांचे आता काय करायचे म्हाणुन तो वेलच मम्मीने आता काढुन टाकला. चपाती दिली कि नाखुष असणारा तू, शिरा केलेल्याचा वास आला की किती वर खाली उड्या मारायचास. घरात केलेला प्रत्येक गोड पदार्थ तुला मिळालेला आहे. दुध, चहा हे तुझे आवडीचे पदार्थ. मिटक्या मारत खालेल्ले श्रीखंड, करंजी, चिरोटे, बर्फ़्या आणी बरेच काही!
सोसायटीतला मोत्या आला की तुझा झालेला राग राग आठवला की हसु येते. तु १२ वर्षे होतास त्या १२ वर्षात सोसायटीमधे कुणाकडे कधीही चोरी झाली नाही. तुझा दबदबाच तेवढा होता.
पप्पांबरोबर फ़िरायला जाणे, मम्मीकडुन लाड करुन खाऊ खाणे, सुबोधकडुन लाड करुन घेणे आणि माझा राग राग करणे हा तुझा नेहमीचा दिवस. आयुष्यात तू फक्त एकदाच माणसाला चावलास आणि तो मनुष्यप्राणी म्हणजे मी! मी अंगण झाडण्यासाठी केरसुणी काढत होते तेव्हा बहुतेक मी तुला मारणारच आहे असे वाटले बहुदा, जे माझ्या हातातुन रक्त काढलेस की बास. आज मी जेव्हा त्या जखमेचा व्रण बघते, मला तु जिन्यावर वरखालीपळायचास तेच आठवते.
तू गेलास तेव्हा तुझ्या जीवाभावाची चारही माणसे तुझ्याशेजारी होती. त्यांच्याकडे प्रेमाने पहात तू प्राण सोडलास. तू गेलास आणि घरातल्या भाकर्यांची संख्या कमी झाली. पण कित्येक दिवस लक्षातच नाही यायचे तू आता नाहीस. तू घरीयेण्याआधी २ कुत्री सांभाळुन झालेली, पण तू गेलास आणि परत कुणाला घरी आणावेसे वाटलेच नाही. तुझी कमी भरुन काढणारे कुणी भेटेल असे वाटलेच नाही.
शोनु, तू आम्हाला काय दिलेस, खुप प्रेम, खुप सुरक्षीतता! आणि आमची आयुष्ये सम्रुद्ध करुन गेलास !!
ह्या आगळ्या मित्राच्या खुप आठवणी आज त्या मित्रामुळे जाग्या झाल्या, तुम्हा दोघानाही धन्यवाद!!
4 comments:
Mints.. mast ga! balajagtaat ashyaa praaNyanche kaay mahatva aste mhaNuun sangu!
sundar liheele ahes. kharach!
chan lihale aahe i like this
that reminds me... amachyakade sudha ek tipu navacha kutra hota..mala tyachi athavan zali... story same ch ahe amachi.. chotasa twist mhanaje to mala chawala ani mela!!
Post a Comment