मी विद्यार्थी अवस्थेतुन शिक्षकावस्थेत कधी शिरकाव केला ते अजुनही नीट आठवते. M.Sc. ची २ वर्षे सोडली तर जवळपास १० वर्षे शिक्षकी केली. बीजगणित-भूमिती, चित्रकला, विणकाम, भरतकाम असले एकमेकांशी संदर्भ नसलेले विषय शिकवले. मम्मीच्या १ली ते ४थी च्या मुलांना मराठी, गणित, इतिहास, भूगोल पण शिकवले.
मला आठवते, मी पहीली दुसरीत असताना मम्मी आणि पप्पा मिळुन शिकवण्या घ्यायचे. त्या घरातुन मग दुसरीकडे रहायला गेल्यावर पप्पांनी ते सोडुन दिले पण मम्मीच्या पहिली ते सातवी शिकवण्या चालु होत्या. त्यातुन ती दुपारी शिवणकाम पण शिकवत असे. घरामधे सतत कोणी ना कोणी काहीतरी शिकत/शिकवत असेच. माझा आणि सुबोधचा अभ्यास पण त्या मुलांबरोबरच होत असे बरेचदा. हे सर्व पहाता पहाता मी स्वत: शिक्षीका केव्हा झाले ते मला समजले देखील नाही.
माझी पहीली विद्यार्थीनी म्हणजे सोनाली. ती शाळेत नेहमी व्यवस्थीत अभ्यास करणार, पहील्या पाच नंबरमधे येणारी ही मुलगी आठवीमधे गणितात कशीबशी पास झाली आणि तिच्या आईला एकदम टेंशन चढले! मग क्लासेसची चौकशी सुरु झाली. काही कारणांमुळे बाहेर कुणाकडे क्लास लावता येणे शक्य नव्हते. असेच बोलता बोलता मला समजले आणि मी तिला सांगितले की, जी गणिते आडतील ती विचारयाला येत जा! अशी अडलेली गणिते सोडवताना तिला वाटले की आपण इथेच रोजची शिकवणी लावाली तर! पण मला जबाबदारी घ्यायची नव्हती कारण माझी practicles, journals, college ह्यातुन मला कितपत जमेल असे वाटत होते. पण खुप आग्रह झाला आणि मग ती जबाबदारी घेतलीच शेवटी. ती रोज येते हे कळल्यावर मग जवळच्या एका शेतकर्यांची मुलगी पण म्हणाली मी पण येणार! झाले मग ह्या दोन पोरी आणि मी आमची सकाळी ८ वाजल्यापासुन गणिताशी झटापट सुरु व्हायची ती मी कॉलेजला किंवा त्या शाळेत जाईपर्यंत!! आणि ह्या शिकवणीचे निकाल, निक्काल प्रकारात न लागता एकदम चांगले लागले. सोनाली १५० पैकी १३२ गुण मिळवुन पहिल्या १५ मधे तरी परत आली आणि ज्योती आठवीला पुढे ढकलली गेलेली तिला १५० पैकी ९० गुण मिळाले. आणि ह्या सर्व गोष्टींचा माझ्या आभ्यासावर काहीही परिणाम (म्हणजे वाईट हो!!) झाला नाही.
पुढे १ली ते ७ वी पर्यंत जे कोणी येईल त्यांना जो लागेल तो विषय शिकवला. बर्याच मुलाना अभ्यासाचे महत्व पटले, गोडी लागली हे त्यांचे आणि माझे दोघांचेही नशिबच म्हणा ना!
M.Sc. करुन परत आल्यावर काय करायचे असा विचार चाललेला होताच. तेव्हा कॉम्प्युटरचा एखादा डिप्लोमा करावा म्हणुन पराडकर क्लासेसला गेले. पराडकरसरांनी सगळी चौकशी करुन मला विद्यार्थी + शिक्षीका असा दुहेरी मुकुट घातला. सकाळी ७.३० ते १२.३० शिक्षक आणि दुपारी २ ते ३ विद्यार्थी असा दिवस विभागला जायला लागला. त्यावेळचे विद्यार्थी म्हणजे अजय शहा वगैरे. अतिशय सज्जन मुले. आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे ही जिद्द असलेली. त्यामुळे सतत नवीन शिकण्याच्या मागे. ह्या मुलांना मी त्यावेळी MS Windows, Word, Lotus वगैरे fundamentals शिकवायचे. आजच्या technology च्या मानाने हे फ़ारच जुनेपुराणे वाटते पण त्यावेळी खरोखर ते शिकवण्यासाठी क्लासेस होते.
पुढे पराडकरसरांना १०वी च्या summer vacation साठी teaching assistant हवा होता. मग ते पण माझ्याच गळ्यात आले. १० वीची डामरट पोरे ती पण उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाला बसवायची यासारखे कौशल्याचे काम इतर कोणतेही नाही! काय त्या खोड्या, काय ते अभ्यास न करण्याचे बहाणे अहाहा!! पण वर्गात एकदम धमाल असायची. मुलींतर नेहेमी मागे मागे असायच्या. तिथे रोज साड्या नेसुन जायची सवय झाली. मग पोरींच्या साड्याबद्दल कॉमेंटस आणि कॉम्प्लिमेंट्स, आवर्जुन फुले आणुन देणे वगैरे नेहेमीचे झाले. तेव्हाच मी रोज सातारला पण जायचे शिकवायला. तेव्हाच कम्युटींगचा पहीला अनुभव पदरात पाडुन घेतला. कराडमधे विद्यार्थी गावात कुठेही भेटायचे, बसमधे, रिक्षात, घाटावर, मंडईत. काहीजण मुद्दम ओळख दाखवुन बोलायचे तर काही आपले लक्ष नव्हते असे दाखवायचे! एकुण मजा यायची.
ह्या मुलांपैकी काहीजण आता US मधे नोकरी, उच्चशिक्षणासाठी आलेत. ऑर्कुटवर भेटतात. मजा वाटते.
त्याचदरम्यान कराड इंजिनीअरींग कॉलेजमधे प्रॅक्टीकल घेण्यासाठी कोणितरी हवे आहे असे कळले. सहज जाउन मी तिथे प्रिन्सिपलना भेटले तर त्यांनी ताबडतोब काम सुरु करायला सांगीतले. डिपार्टमेंट हेडना जेव्हा कळले की मी Statistics मधे M.Sc. केलेय तेव्हा त्यांनी लगेचच मला probability चे एक लेक्चर घ्यायला सांगितले. ते स्वत: मागे येउन बसले. माझे शिकवणे त्यांना बरे(!) वाटले असावे, पुढे आठवड्यातुन २ तास घेण्यास सांगितले. दुस~या सेमीस्टर ला मग Numerical Mathematics शिकवला. Practicles करताना लक्ष ठेवणे वगैरे चललेलेच होते. इथले माझे विद्यार्थी माझ्याहुन कसेबसे १ ते २ वर्षाने लहान होते. पण उच्चशिक्षणासाठी आल्याने व्यवस्थित अभ्यास वगैरे करायचे. अर्थात टवाळक्या वगैरे पण व्हायच्याच. काही मित्रासारखे मदतीला आले. तिथे मी अडिच वर्षे शिकवले. २ बॅचेसना शिकवले, ज्योतीसारखी जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खुप चांगले, थोडे वाईट अनुभव गाठीशी बांधले.
ह्या काही वर्षांच्या ब~या-वाईट अनुभवांची शिदोरी आता जन्मभर पुरणारी आहे. सगळ्यात जास्ती कसोटी लागली ती एका गुणाची - patience!!!
Tuesday, February 13, 2007
Tuesday, November 28, 2006
रविवार माझ्या आवडीचा ...!!??!!
दिवस उद्याचा हा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा
गेले कित्येक रविवार काम, खरेदी, कुणाचे वाढदिवस अशातच चालले आहेत. खुप दिवसापासुन रविवारी फ़क्त आराम करायचा, गाणी वगैरे ऐकत मनसोक्त पुस्तके वाचायची, मनसोक्त चित्रे काढायची इच्छा आहे. मला आठवतात ते सगळे लहानपणीचे रविवार असेच मस्त लोळत पुस्तक वाचलेले किंवा रंगाच्या गराड्यात बसुन असंख्य चित्रे काढलेले. टेलीव्हीजन नावाचा प्रकार मी लहान असताना म्हणजे मी १०वी मधे जाईपर्यंत घरी आलेला नव्हता त्यामुळे तो सगळा वेळ मला माझे बरेच उद्योग करण्यासाठी वापरता यायचा.
रविवार सकाळ सुरु व्हायची ती नेहेमीप्रमाणे पप्पांनी लावलेल्या रेडीओमुळे, जी अजुनही होते कराडला गेले की! मग मम्मीने कप मधे घालुन दिलेले दुध गरम आहे म्हणुन तासभर पित बसायचे. तास अन तास दुध पित बसते ही रोजची ओरडणी रविवारी पण चुकायची नाहीत! मग अंघोळ वगैरे करुन आठ सव्वाआठला बालोपासनेला जायचे आणि रमत गमत साडेदहा पर्यंत परत यायचे. कधी मम्मी पप्पा मंडईत गेलेले असायचे, मग ते येईपर्यंत लैलाच्या आई घरात बसवुन ठेवायच्या. तोपर्यंत मग पेपर अलेला असेल तर (तेव्हा कराडला लोकसत्ता दुपारपर्यंत कधीतरी यायचा) बालविभाग वाचत बसायचे. किशोर, कुमार ही मासीके पण घरी यायची, अमृत पण असायचा काहीतरी वाचत बसायची खोड लागली. मम्मी पप्पा मंडईतुन आले की जेवण करुन जेवुन मम्मी पेपर वाचत बसायची कोडी सोडवणे हा तिचा आवडता छंद होता. दुपारभर चित्रे काढणे, सुबोधबरोबर भांडणे, बाहेर खेळायला जाऊ का अशी भुणभुण लावणे. पप्पांची डुलकी झाली की ते दुपारी विविधभारती, किंवा सिलोन रेडीओवर हिंदी गाणी लावायचे. काही कळायचे नाही पण कानावर पडायचे.
कधी कधी सकाळी उठायला उशीर झाला आणि बालोपासनेला गेले नाही तर मग सकाळचे बालोद्यान ऐकायला मिळायचे. शमा खळे, रचना आणि योगेश खडीकर यांची गाणी अगदी तोंडपाठ होती. पप्पांना गाणी ऐकायची प्रचंड हौस होती (आणि अजुनही तितकीच आहे!) त्यामुळे कामगार सभा, आपली आवड, लहान मुलांची आपली आवड, दुपारी मुंबई ब केंद्रावर लहान मुलांच्यासाठी कथावाचन वगैरे असायचे. फास्टर फेणे, गोट्या पहिल्यांदा तिथे ऐकले. टी.व्ही नव्हता त्यामुळे संध्याकाळी सगळी गल्ली डबाऐसपैस, लगोरी, लपाछपी असले फुटकळ खेळ खेळायचो. पण ते सुद्धा संध्याकाळीच कारण मम्मी पप्पा आज्जीबात दिवसभर घरातुन बाहेर पाठवायचे नाहीत. घरात बसुन वाचन करणे, अभ्यास करणे, चित्रे काढणे हे सगळ्यात महत्वाचे वाटे. आजुबाजुला रहाणारी मुले-मुली म्हणजे एका वर्षात २ वेळा बसले तरी चालते ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे पण असेल. आठवीनंतर ३ वर्षे शेजार नव्हताच त्यामुळे मग माझेच काही काही उद्योग चालायचे. त्या दरम्यान रवीवारच्या सुट्टीत केलेला एक अतीशय महत्वाचा उद्योग म्हणजे मैत्रीणीन्च्या घरी जाउन वेगवेगळी फुलझाडे गोळा करणे, वेलींना आलेल्या फुलांचे गाठींचे गजरे करणे!!
काय धमाल दिवस होते! गेल्यावर्षी मामेभावंडांचे रविवार बघीतले आमच्याच गावात, ह्या पोरांना रेडीओ माहीत नाही, बालगीते माहीत नाहीत, दिवसभर कसले कसले क्लास आणि टी. व्ही.!! कळत नाही ही मुले काही गमावताहेत की आम्ही खुप सारे क्लास न करुन खुप काही शिकलो नाहीये ...
रविवार माझ्या आवडीचा
गेले कित्येक रविवार काम, खरेदी, कुणाचे वाढदिवस अशातच चालले आहेत. खुप दिवसापासुन रविवारी फ़क्त आराम करायचा, गाणी वगैरे ऐकत मनसोक्त पुस्तके वाचायची, मनसोक्त चित्रे काढायची इच्छा आहे. मला आठवतात ते सगळे लहानपणीचे रविवार असेच मस्त लोळत पुस्तक वाचलेले किंवा रंगाच्या गराड्यात बसुन असंख्य चित्रे काढलेले. टेलीव्हीजन नावाचा प्रकार मी लहान असताना म्हणजे मी १०वी मधे जाईपर्यंत घरी आलेला नव्हता त्यामुळे तो सगळा वेळ मला माझे बरेच उद्योग करण्यासाठी वापरता यायचा.
रविवार सकाळ सुरु व्हायची ती नेहेमीप्रमाणे पप्पांनी लावलेल्या रेडीओमुळे, जी अजुनही होते कराडला गेले की! मग मम्मीने कप मधे घालुन दिलेले दुध गरम आहे म्हणुन तासभर पित बसायचे. तास अन तास दुध पित बसते ही रोजची ओरडणी रविवारी पण चुकायची नाहीत! मग अंघोळ वगैरे करुन आठ सव्वाआठला बालोपासनेला जायचे आणि रमत गमत साडेदहा पर्यंत परत यायचे. कधी मम्मी पप्पा मंडईत गेलेले असायचे, मग ते येईपर्यंत लैलाच्या आई घरात बसवुन ठेवायच्या. तोपर्यंत मग पेपर अलेला असेल तर (तेव्हा कराडला लोकसत्ता दुपारपर्यंत कधीतरी यायचा) बालविभाग वाचत बसायचे. किशोर, कुमार ही मासीके पण घरी यायची, अमृत पण असायचा काहीतरी वाचत बसायची खोड लागली. मम्मी पप्पा मंडईतुन आले की जेवण करुन जेवुन मम्मी पेपर वाचत बसायची कोडी सोडवणे हा तिचा आवडता छंद होता. दुपारभर चित्रे काढणे, सुबोधबरोबर भांडणे, बाहेर खेळायला जाऊ का अशी भुणभुण लावणे. पप्पांची डुलकी झाली की ते दुपारी विविधभारती, किंवा सिलोन रेडीओवर हिंदी गाणी लावायचे. काही कळायचे नाही पण कानावर पडायचे.
कधी कधी सकाळी उठायला उशीर झाला आणि बालोपासनेला गेले नाही तर मग सकाळचे बालोद्यान ऐकायला मिळायचे. शमा खळे, रचना आणि योगेश खडीकर यांची गाणी अगदी तोंडपाठ होती. पप्पांना गाणी ऐकायची प्रचंड हौस होती (आणि अजुनही तितकीच आहे!) त्यामुळे कामगार सभा, आपली आवड, लहान मुलांची आपली आवड, दुपारी मुंबई ब केंद्रावर लहान मुलांच्यासाठी कथावाचन वगैरे असायचे. फास्टर फेणे, गोट्या पहिल्यांदा तिथे ऐकले. टी.व्ही नव्हता त्यामुळे संध्याकाळी सगळी गल्ली डबाऐसपैस, लगोरी, लपाछपी असले फुटकळ खेळ खेळायचो. पण ते सुद्धा संध्याकाळीच कारण मम्मी पप्पा आज्जीबात दिवसभर घरातुन बाहेर पाठवायचे नाहीत. घरात बसुन वाचन करणे, अभ्यास करणे, चित्रे काढणे हे सगळ्यात महत्वाचे वाटे. आजुबाजुला रहाणारी मुले-मुली म्हणजे एका वर्षात २ वेळा बसले तरी चालते ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे पण असेल. आठवीनंतर ३ वर्षे शेजार नव्हताच त्यामुळे मग माझेच काही काही उद्योग चालायचे. त्या दरम्यान रवीवारच्या सुट्टीत केलेला एक अतीशय महत्वाचा उद्योग म्हणजे मैत्रीणीन्च्या घरी जाउन वेगवेगळी फुलझाडे गोळा करणे, वेलींना आलेल्या फुलांचे गाठींचे गजरे करणे!!
काय धमाल दिवस होते! गेल्यावर्षी मामेभावंडांचे रविवार बघीतले आमच्याच गावात, ह्या पोरांना रेडीओ माहीत नाही, बालगीते माहीत नाहीत, दिवसभर कसले कसले क्लास आणि टी. व्ही.!! कळत नाही ही मुले काही गमावताहेत की आम्ही खुप सारे क्लास न करुन खुप काही शिकलो नाहीये ...
जोगीण
काल प्रिया च्या चाट चा status message ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या पहिल्या ३ ओळी होत्या. मी कवीतांपासुन नेहेमी ४ हात लांब रहाणारी, पण ह्या ओळी मात्र एकदम भावल्या. तिच्या परवानगीने मग मी तो माझा status message केला (अर्थात तिला दुसरी ह्या कवितेसारखी अजुन एक मस्त कविता मिळालीच!!) त्यावर अजुन एका मैत्रीणीने विचारल्यावरुन ही सगळी कवीता इथे टाकतेय.
जोगीण
साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...
तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...
~कुसुमाग्रज
सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!
जोगीण
साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...
तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...
~कुसुमाग्रज
सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!
Tuesday, November 21, 2006
एकटेपणा
मला सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा. मला आठवतेय तशी मी सतत माणसांमधेच राहीले आहे. पण माणसांच्या गोतावळ्यात राहुनही कधीकधी एकटेपणा घेरतो त्याला काय म्हणायचे? मला आठवतेय ४थी मधे शाळा सुटल्यावर scholaship चा क्लास असायचा. तो झाला की मी आणि मेघु टंगळमंगळ करत घरी जायचो. घरी जाईपर्यंत साधारण २ वाजायचे म्हणुन शाळा सुटल्यावर खाण्यासाठी मम्मी पप्पांच्याबरोबर १०.३० ला चपाती-भाजी किंवा भाजी-भाकरी-लोणी असा डबा द्यायची. वर्गात सगळ्यांचेच तसे डबे यायचे. आम्ही शाळा सुटल्यावर साधारण १२ वाजता तो डबा खायचो.
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.
गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.
आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।
ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.
गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.
आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।
ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...
Wednesday, October 25, 2006
Tuesday, October 10, 2006
मेहेन्दीचा अनोखा रंग
30 Sept ला मी Hers Annual Breast Cancer walk ला गेलेले. हे माझे तिथे जाण्याचे दुसरे वर्ष. मला hike ला जायला आवडते म्हणुन मी पहिल्या वर्षी जाणार होते पण त्या संस्थेच्या चालीकेला कळले की मला बर्यापैकी ठीक मेहेंदी काढते आणि हौशी कलाकार आहे वगैरे. तिने मला गळ घातली आणि मी त्यावर्षी जाउन जवळपा्स ७५-८० पोरी आणि बायकांच्या हातावर नक्ष्या काढुन परत आलेले. मला त्याचे पार अप्रुप न वाटल्याने, त्याचे फ़ार महत्व न वाटल्याने गेल्या वर्षी मी गेलेच नाही. ह्यावर्षी त्या चालीकेचा परत फोन आला आणि मी हो म्हणाले. एक तर वेळ होता आणि मेहेंदी काधायला हात शिवशिवत पण होता. पण ह्यावेळी बाकीचे volunteers खुपसे interested नसल्याने गर्दी तशी कमीच होती. एक साधारण ६० वर्षाची दोक्यावर अजिबात केस नाहीत अशी तरुणी(!)तिच्या २ मैत्रिणींच्यासोबत माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला एक डिझाईन कढणार का? मला तिच्याकडे बघुन कल्पना आलीच होती की ती सध्या किमोथेरपी मधुन जात असावी. मी आनंदाने एक डीझाईन काढले. तेवढ्यात मग opening ceremony चालु झाला आणि ती मला म्हणाली की ती walk झाल्यावर परत येइल. त्या ओपनींग सेरेमोनी मधे मला कळाले की ती सगळ्यात अलिकडची survivor आहे. तिचे operation होऊनफक्त २ महीने झालेले. माझ्या डोळ्यात एक्दम पाणी आले. किती उत्साही होती ती! इतक्या मोठ्या life threatening event मधुन जाउन पण एकदम उत्साही, खेळकर!
उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम मनाला स्पर्शुन जाणारा होता. माझ्या एका मैत्रीणीची आई २ वर्षापूर्वी breast cancer मुळे अचानक गेली आणि मला ह्या विषयाची गंभीरता जास्ती समजली. सगळ्यानी आपापले नविन वय सांगितले. एक जण तर ३० वर्षे survivor आहे.
Walk संपला आणि ती कन्या माझ्याकडे परत आली म्हणाली आता परत थोडे डीझाईन काढ! मग मी तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला अजुन काही डिझाईन काढले. तिच्या मैत्रीणीना खुप आवडले. तिच्या आनंदात त्यानी मला पण सामील करुन घेतले. माझ्या डोळ्यातुन एकदम पाणी आले. माझी कला अश्याप्रकारे कधी कोणाला आनंद देईल असे मला अजीबात वाटले नव्हते. त्यानंतर जवळपास १०-१५ जणी येउन माझे आभार मानुन गेल्या कारण काय तर - I helped a survivor enjoy her day and she helped many of them to celebrate!
उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम मनाला स्पर्शुन जाणारा होता. माझ्या एका मैत्रीणीची आई २ वर्षापूर्वी breast cancer मुळे अचानक गेली आणि मला ह्या विषयाची गंभीरता जास्ती समजली. सगळ्यानी आपापले नविन वय सांगितले. एक जण तर ३० वर्षे survivor आहे.
Walk संपला आणि ती कन्या माझ्याकडे परत आली म्हणाली आता परत थोडे डीझाईन काढ! मग मी तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला अजुन काही डिझाईन काढले. तिच्या मैत्रीणीना खुप आवडले. तिच्या आनंदात त्यानी मला पण सामील करुन घेतले. माझ्या डोळ्यातुन एकदम पाणी आले. माझी कला अश्याप्रकारे कधी कोणाला आनंद देईल असे मला अजीबात वाटले नव्हते. त्यानंतर जवळपास १०-१५ जणी येउन माझे आभार मानुन गेल्या कारण काय तर - I helped a survivor enjoy her day and she helped many of them to celebrate!
Saturday, September 02, 2006
॥ गणपती बप्पा मोरया ॥

घरी मम्मी पप्पा गणपती बसवायला लागुन जवळपास आता २० वर्षे तरी होत आली. गणपती माझ्या अतीशय आवडीचा देव. तसा तो सगळ्यांचाच असतो म्हणा. गेल्या ७ वर्षातल्या गणपतीला मी भारतात नाहीये. माझ्या पद्धतीने मी माझ्यापुरता गणपती साजरा करते. सकाळी उठुन दुर्वा काढुन आणणे, त्या निवडुन नीट त्याच्या जुड्या बनवणे, फुले काढुन आणणे, रांगोळी काढणे असले उद्योग करत सकाळ जायची. घरात मम्मी नंदादीप ठेवते मग त्यात तिला मदत करणे. फ़ुलवाती, कापसाची वस्त्रे करणे ह्यात पण मम्मीला मी आवडीने मदत करायचे. अता ते काही करत नाही- करावे वाटते पण ...
मला माझ्या आठवणीतले खुप गणपती कोल्हापुरला किंवा पुण्याला आजी जिथे असेल तिथे असायचे ते पण आठवतात. आम्ही सुट्टी घेउन जायचो. आजी गेल्यावर मग पुण्यात काकांच्याकडे असायचा गणपती ते पण आठवते. पण लक्षात राहीलेला एक गणपती - मी फ़क्त २ वर्षाची होते, कोल्हापुरच्या घरात बसवलेला गणपती, अण्णा करत असलेली पुजा अंधुक आठवते. बाकी काही नाही आठवत. मग अण्णा गेल्यानंतर पप्पा आणि कडगावच्या अज्जांबरोबर जाउन आणलेला गणपती, घरातली पुजा, विसर्जनाला मी हट्टाने गेलेले, घरचा गड्याने, नागाप्पाने, गणपती विसर्जन करताना वाईट वाटलेले अजुन आठवते.
कराडला जेव्हा आम्ही स्वत:च्या घरी रहायला आलो तेव्हा आणलेला पहीला गणपती पण आठवतो. मी आणि मामा गेलो होतो आणायला. पाउस पडत होता. आणि बसमधुन चिखलातुन सावरत आणलेला गणपती आठवतो. रात्री आम्ही चौघे मिळुन गणपतीची आरास करायचो. खुप आरास नसायची मग ते सगळे मी वेगवेगळ्या flower arrangements करुन सजवुन टाकायचे. रोजाचे पंचाम्रुत करायचे काम माझ्याकडे असायचे. ऋषीपंचमीला मम्मी सकाळी भजनाला पाथवायची ते पण आठवते. त्यादिवशी जाताना आजीसाठी आमच्या बागेत पिकवलेली भाजी आजिच्या उपसासाठी बरोबर न्यायचे. मग मम्मी संध्याकाळच्या भजनाला जाताना मग परत आजीसाठी काहीतरी घेउन जायची.
मामांकडचा गणपती अप्पाअसेपर्यंत ते घरीच बनवायचे. त्याचे ते साचे वगैरे सगळे ते नीट ठेवायचे श्रावणातच त्यांची मूर्ती बनवायची गडबड सुरु व्हायची. गौरीचे मुखवटे पण ते घरी बनवायचे. शाळा असल्यामुळे सगली प्रोसेस कधी पूर्ण पहायला नाही मिळाली पण घरी बनवलेला गणपती असल्याने आजीकडच्या गणपतीची मजा वेगळीच असायची. मामा लोक अगदी मन लावुन साग्रसंगीत आरास करायचे. मुंबईला असलेले मामा नेहेमी गणपतीला सुट्टी काढुन घरी यायचे. विसर्जनाच्या दिवशी मग एक मामा पप्पांच्या मदतीला घरी येणार मग आमचा गणपती विसर्जन करुन, प्रसादाची खिरापत वाटुन मग आजीकडचा गणपती पोचवायला मग मी आणि कधीतरी सुबोध मामांकडे जायचो. आम्ही नदीपासुन दुर रहायचो म्हणुन मग आमचा गणपती विहिरीमधे विसर्जन करायचो. मामांचा गणपती मात्र नेहेमी नदिवर मग धाकटा मामा अगदी नदीमधे आत जाउन गणपती विसर्जन करायचा. पण आम्हा पोराना मात्र नदिच्या पाण्यात पाय घालायची पण परवानगी नसायची. कारण कोयना दुथडी भरुन वहात असायची, बरेचदा विसर्जनाच्यावेळी पऊस पण असायचा. आजीकडचे विसर्जन होईपर्यंतजवळ्पास रात्रीचे साडेसात वाजायचे. खिरापत घेउन मग घरी येत असताना मग मामालोकांच्या डोक्यात गणपती पहायला जायचे विचार यायचे. मग एक मामा सायकलवरुन मम्मीला सांगायला घरी सुटायचा. मग आजीकडेच जेउन रात्रभर गणपती बघुन मग आजीकडे झोपायचे मग कोणीतरी मामा सकाळी ८ वाजता घरी सोडायचा. आजीच्या बरोबर तिच्या अंथरुणात झोपायला मस्त वाटायचे. सकाळी जाग यायची ती आजी गणपतीचे सगळे आवरुन ठेवत असायची त्याचे आवाज ऐकतच.
सहावी ते जवळपास बारावी पर्यंत जवळपास हाच कार्यक्रम असायचा. नंतर हे सगळे कधी आणि का बंद झाले ते पण समजले नाही. दरवर्षी गणपती मधे ह्या सगळ्या आठवणी जाग्या होतात, कधी हसु येते कधी रडु येते. सगळ्याच्या आठवणी येतात. अजोबानी केलेले गणपती आता पहायला नाही मिळणार म्हणुन वाईट वाटते. पण माझा गणपती बाप्पा येताना माझ्यासाठी सहत्रावधी आठवणींचे मोदक घेउन येतो हेच मला खुप महत्वाचे वाटते.
Subscribe to:
Posts (Atom)
