नंदनने लिहायला चालु केले आणि आगावुपणाने लग्गेच सांगितले की टॅग का चालु करत नाही? मला अजीबात वाटले नव्हते की तो मनावर घेईल ;) पण तो नंदन आहे हे विसरले! आज स्वाती परत टॅग केले आणि अजुन लोकानी आठवण करुन द्यायच्या आत लिहावे म्हणुन बसले आणि आवडणारी सगळी पुस्तके समोर काढली आणि हे लिहु का ते असे काहीसे झाले.
नंदन ने हा उपक्रम सुरु करण्यासाठी ’पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन.’ असे साधे सोपे समीकरण देउनही ते आता कठीण वाटतेय :)
माझ्या अत्यंत आवडत्या उता-यांपैकी खालील एक उतारा -
धबधब्याजवळ पोचल्यावर अम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला कोण पाण्यात पळायला लागला. टुकण्या पाण्यातच बसुन राहीला. त्याने शर्ट काढुन टाकला होता. कणब्या रंगीत दगड गोळा करत होता. मुली फुले गोळा करत होत्या. मास्तरांनी कोट, टोपी काढुन धोतराचा काचा मारला होता. ते धबधब्यांच्या रांगेत उभे राहुन हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहीले. टोपी आणि कोट नसलेले, हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोरात पाऊस आला तेव्हा ते देवळाकडं पळाले नाहीत. आमच्याबरोबरच भिजत राहिले. मग वेलंगीबाईही धबधब्यांच्या रांगेत येउन उभ्या राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडं हिरवंगार होतं. आणि सगळीकडं भरुन राहीलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा, असं वाटत होतं.
पायाखालुन आणि वरुन वाहाणारं पाणी गुदगुल्या करुन पुढं जात होतं. इकडं तिकडं पळणारी मुलंमुली हळूहळू त्या धबधब्याच्या समोरच आली. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली. लोखंडीसाखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी, वेगळ्या वेगळ्या हसणा-या बोलणा-या आवाजांची साखळी. आम्ही वेगवेगळी मुलं नव्हतोच, तर आम्ही सगळी एकच आहोत, असं मॅड्सारखं वाटत होतं. वाहाणा-या पाण्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या हातात हात घालुन आम्ही कुठतरी निघालो आहोत, असं वाटत होतं. मधेच मॅड्सारखं पिवळंधमक ऊन पडलं. कुठं कुठं भरुन राहीलेलं पाणी अंगठीतल्या खड्यासार्खं चमकायला लागलं. माझ्या डाव्या हातात कुणाचा तरी हात होता. तो थोडासा टोचणारा हात जाउन नवाच कोणता तरी हात आला होता. न पहाताच असं वाटत होतं की हा हात ओळखीचा आहे. मी डावीकडं पाहिलं तर शेजारी सुमी उभी होती. तिनं माझा हात घट्ट पकडला होता. ती माझ्याकडं पाहुन हसत होती. पाण्याचे कितीतरी बारीक थेंब तिच्या केसांत अडकुन राहीले होते. ती माझ्या डोळ्यातच पहात होती. त्या हिरव्या रंगाच्या वासातूनही सुमीच्या केसांतील सोनटक्क्याच्या फुलांचा वास येत होता. खरं तर त्या सर्व हसण्याला आणि ओरडण्याला सोनटक्क्याच्या फुलांचा वासच असावा, असं वाटत होतं. माझ्या डोक्यात असला कही गोंधळ चालू असताना सुमी म्हणाली,
"किती छान आहे ना?"
मी मान हलवली.
-----------
साखळी, ’वनवास’ - प्रकाश नारायण संत
आता मी खालील लोकाना टॅग करते -
संवेद
सुमेधा
प्रियंभाषीणी
कृष्णाकाठ
परागकण
मी शक्यतो अत्तापर्यंत ज्यांना टॅग केले गेले नाही असे लोक शोधायचा प्रयत्न केलाय.
(P.S. सुमेधा आणि संवेद या दोघाना अजुन कोणीतरी तग केल्याचे दिसले. म्हणुन बदलते आहे. नवीन टॅग खालीलप्रमाणे -
शोनू
गायत्री)
Thursday, October 04, 2007
Friday, September 14, 2007
गणपती बप्पा मोरया!
गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ते! येथे टिचकी मरा . अगदी स्टेप बाय स्टेप दिलेय मी.
मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.
मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.
Sunday, September 09, 2007
आई मला शाळेत जाऊ दे ...
सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.
शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.
नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...
पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!
आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.
शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.
नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...
पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!
आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.
Thursday, September 06, 2007
बेळगाव की बोळगाव
आज प्रकाश संत यांचे ’पंखा’ वाचत होते खुप दिवसानी. त्यातली भाषा, जागांचे उल्लेख सगळे आहेत ते बेळगावचे. बेळगावशी पहीला संबंध कधी आला माहीत नाही. मला आठवतेय तसे गिरिशकाकांच्या लग्नाला की रिसेप्शनला पहिल्यांदा बेळगावला गेलेले ते आठवते. हे सगळे असले तरी बेळगावचा पहीला ऐकीव उल्लेख आठवतो तो म्हणजे रावसाहेब! पु. ल. नी बेळगावच्या भाषेची एवढी सुंदर नक्कल केलीय की बास. पण ते गाव मनापासुन घर करुन राहीले ते मात्र दोन कारणांसाठी - एक म्हणजे आमचे हरिमंदिर आणि दुसरे म्हणजे आज्जीचे घर. हरिमंदिराविषयी मी पामर काय लिहिणार. तिथे मिळालेली शांती जगात मला अजुन कोठेही अनुभवता आलेली नाही.
आज्जी म्हणजे माझ्या वडीलांची मावशी. बहीण गेल्यावरही तितक्याच आपुलकीने आमच्या सगळ्यांचे लाड करणारी आज्जी. मला आज्जी म्हणले आठवणा~या ४ आज्जीपैकी एक. माझे आजोळ कराडच. त्यामुळे आजोळी जाणे वगैरे अप्रुप आम्हाला कधी चाखायला मिळालेच नाही. त्यातुनही अजोळी बरेच तिढे पडल्याने आज्जी, अजोबा आणि एक मामा यांच्याशिवाय कोणी प्रेमाचे वाटु नये अशी परीस्थीती. त्याच न कळत्या वयात आत्या आणि काकांच्या लग्नासाठी म्हणुन बेळगावला रहायला गेले होते. घरात आम्ही १०-१२ चुलत भावंडांची पलटण होती. त्यात मी सगळ्यात मोठी! त्यावेळी आम्हा भावंडांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे सांगणेही जमत नसे. टि. व्ही. नव्हता त्यामुळे सतत कसला ना कसला तरी खेळ खेळत आमचा दंगा चालायचा. आजोबांचा होलसेलचा मोठा व्यावार होता आणि त्याचे ऑफीस घरात असल्याने त्याची पण वर्दळ सतत असायची. मराठीची वेगळी ढब आधीपासुन माहीत होती पण तिथे राहिल्यावर आमच्याही भाषेत झालेला फ़रक कधी जाणवला नाही. ’आत्ता हेच जेवुन सोडलो बघा.’ असली वाक्ये ऐकुन हसणारे आम्ही २ दिवसात नकळत पणे तसेच बोलायला लागलेलो. घरात राचोटीअज्जा म्हणुन एक स्वयंपाकी होते खुप वयस्कर. ते अजुशी वगैरे कधीतरी इंग्लिशमधे बोलायचे. ऐकुन मजा वाटायची. घरात निम्मे लोक मराठी आणि निम्मे कानडी त्यामुळे सहज दोन्ही भाषा कळायला लागलेल्या. सकाळी अज्जारी दुकानात जाईपर्यंत जरा घरात शांतता कारण निम्मी पलटण उठलेली नसायची. कधीतरी लवकर उठुन अज्जारींच्याबरोबर दुध घ्यायची वेळ आली की ततपप होणार हे नक्की कारण ते नक्की कुठले तरी मराठी वाक्य ऐकवुन हे म्हणजे काय ते सांग असले काहीकाही सांगत! बेळगावमधे राहुनही आज्जी आणि अज्जारी मराठी नेहेमी वाचत त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे.
समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, रेडीओ टॉकीज, सन्मान, बिस्कीट महादेव, मिलिटरी महादेव, कित्तुर चन्नम्माचा पुतळा, बाळेकुंद्री ही सगळी ठिकाणे तिथे राहील्याने माहीत झाले. लाल मातीने पांढ~या फॉकचे जे काही नमुने झालेले ते बघुन मम्मी जवळपास बेशुध्दच पडायची राहीलेली. बेळगावला खाल्लेली ओल्या काजुची उसळ, आलेपाक अवल्लक्की, कुंदा अजुनही आठवत रहातो. प्लांचेट हा प्रकार तिथे पहिल्यांदा पाहीला. प्रचंड भीती वाटलेली तेही नीट आठवते.
तिथुन पुढे एक वर्षाआड का होईना बेळ्गावला जात आले आणि ते गाव तिथली माणसे, भाषा यांच्या परत नव्याने प्रेमात पडत आले. त्याच दरम्यान कधीतरी पुलंची रावसाहेबची कॅसेट घरी आणलेली. त्याची पारायणे करताना बेळगावची मिठास सतत वाढत राहीली. परवा डिसेंबरमधे बेळगावला जाउन आले बराच फ़रक झालेला जाणवला. आज्जी अजोबा दोघेही थकले. आज्जारींची पुर्वीइतकी भीती पण वाटत नाही पण आदर मात्र पुर्वीपेक्षा दुपटीने वाढलाय. त्यांच्या कर्तुत्वाचा मोठेपणा आता जास्ती भावतो. चुलत भाऊ बहिणी आता खुप मोठे झालेत तरी तेच प्रेम तीच आपुलकी अजुनची आहे. गाव बदलले बोळही आता राहीले नाहीत पण मातीचा रंग, हवा अज्जिबात बदललेला नाही. अजुनही आज्जी बाजारात तेवढ्याच उत्साहाने जाते पण आता धाकटी चुलत बहीण तिच्या सोबत असते.
गाव बदलत जाईलच, माझे जाणे जसे जमेल तसे जेव्हा जमेल तेव्हा ह्या प्रकारात जाईल पण प्रकाश संतांची पुस्तके आणि पुलंचे रावसहेब मला मी पाहीलेल्या बेळगावची आठवण नक्की करुन देतील.
आज्जी म्हणजे माझ्या वडीलांची मावशी. बहीण गेल्यावरही तितक्याच आपुलकीने आमच्या सगळ्यांचे लाड करणारी आज्जी. मला आज्जी म्हणले आठवणा~या ४ आज्जीपैकी एक. माझे आजोळ कराडच. त्यामुळे आजोळी जाणे वगैरे अप्रुप आम्हाला कधी चाखायला मिळालेच नाही. त्यातुनही अजोळी बरेच तिढे पडल्याने आज्जी, अजोबा आणि एक मामा यांच्याशिवाय कोणी प्रेमाचे वाटु नये अशी परीस्थीती. त्याच न कळत्या वयात आत्या आणि काकांच्या लग्नासाठी म्हणुन बेळगावला रहायला गेले होते. घरात आम्ही १०-१२ चुलत भावंडांची पलटण होती. त्यात मी सगळ्यात मोठी! त्यावेळी आम्हा भावंडांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे सांगणेही जमत नसे. टि. व्ही. नव्हता त्यामुळे सतत कसला ना कसला तरी खेळ खेळत आमचा दंगा चालायचा. आजोबांचा होलसेलचा मोठा व्यावार होता आणि त्याचे ऑफीस घरात असल्याने त्याची पण वर्दळ सतत असायची. मराठीची वेगळी ढब आधीपासुन माहीत होती पण तिथे राहिल्यावर आमच्याही भाषेत झालेला फ़रक कधी जाणवला नाही. ’आत्ता हेच जेवुन सोडलो बघा.’ असली वाक्ये ऐकुन हसणारे आम्ही २ दिवसात नकळत पणे तसेच बोलायला लागलेलो. घरात राचोटीअज्जा म्हणुन एक स्वयंपाकी होते खुप वयस्कर. ते अजुशी वगैरे कधीतरी इंग्लिशमधे बोलायचे. ऐकुन मजा वाटायची. घरात निम्मे लोक मराठी आणि निम्मे कानडी त्यामुळे सहज दोन्ही भाषा कळायला लागलेल्या. सकाळी अज्जारी दुकानात जाईपर्यंत जरा घरात शांतता कारण निम्मी पलटण उठलेली नसायची. कधीतरी लवकर उठुन अज्जारींच्याबरोबर दुध घ्यायची वेळ आली की ततपप होणार हे नक्की कारण ते नक्की कुठले तरी मराठी वाक्य ऐकवुन हे म्हणजे काय ते सांग असले काहीकाही सांगत! बेळगावमधे राहुनही आज्जी आणि अज्जारी मराठी नेहेमी वाचत त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे.
समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, रेडीओ टॉकीज, सन्मान, बिस्कीट महादेव, मिलिटरी महादेव, कित्तुर चन्नम्माचा पुतळा, बाळेकुंद्री ही सगळी ठिकाणे तिथे राहील्याने माहीत झाले. लाल मातीने पांढ~या फॉकचे जे काही नमुने झालेले ते बघुन मम्मी जवळपास बेशुध्दच पडायची राहीलेली. बेळगावला खाल्लेली ओल्या काजुची उसळ, आलेपाक अवल्लक्की, कुंदा अजुनही आठवत रहातो. प्लांचेट हा प्रकार तिथे पहिल्यांदा पाहीला. प्रचंड भीती वाटलेली तेही नीट आठवते.
तिथुन पुढे एक वर्षाआड का होईना बेळ्गावला जात आले आणि ते गाव तिथली माणसे, भाषा यांच्या परत नव्याने प्रेमात पडत आले. त्याच दरम्यान कधीतरी पुलंची रावसाहेबची कॅसेट घरी आणलेली. त्याची पारायणे करताना बेळगावची मिठास सतत वाढत राहीली. परवा डिसेंबरमधे बेळगावला जाउन आले बराच फ़रक झालेला जाणवला. आज्जी अजोबा दोघेही थकले. आज्जारींची पुर्वीइतकी भीती पण वाटत नाही पण आदर मात्र पुर्वीपेक्षा दुपटीने वाढलाय. त्यांच्या कर्तुत्वाचा मोठेपणा आता जास्ती भावतो. चुलत भाऊ बहिणी आता खुप मोठे झालेत तरी तेच प्रेम तीच आपुलकी अजुनची आहे. गाव बदलले बोळही आता राहीले नाहीत पण मातीचा रंग, हवा अज्जिबात बदललेला नाही. अजुनही आज्जी बाजारात तेवढ्याच उत्साहाने जाते पण आता धाकटी चुलत बहीण तिच्या सोबत असते.
गाव बदलत जाईलच, माझे जाणे जसे जमेल तसे जेव्हा जमेल तेव्हा ह्या प्रकारात जाईल पण प्रकाश संतांची पुस्तके आणि पुलंचे रावसहेब मला मी पाहीलेल्या बेळगावची आठवण नक्की करुन देतील.
Wednesday, August 29, 2007
श्रद्धा की अवडंबर?
गेल्यावर्षी भारतात गेले होते त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे देवळांची वाढणारी संख्या, खुप वेगवेगळ्या महाराजांची नावे, व्याख्याने वगैरेंच्या जाहीराती. प्रत्येक गल्लीत असलेली गणपती मंडळे प्रत्येकाचे वेगळे ऑफीस! अचानक हा बदल कधी झाला? इतके वेगवेगळे साधु अचानक कुठुन आणि कधी आले? त्यांना स्वत:च्या प्राचाराची आवश्यकता का वाटायला लागली. हे सगळे नक्की बदलले कधी.
लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव चालु केला होता त्याच कारणाने अजुनही चालु ठेवावा असे मला अज्जीबात वाटत नाही पण त्याला आलेले प्रचारकी म्हणा किंवा बाजारु जे स्वरुप आहे ते कोठेतरी खटकते. गल्लोगल्ली असलेली गणेश मंडळे आहेत ती नक्की काय कामे करतात? त्या गल्लीतला गुंडच त्याचा प्रमुख असतो बरेचवेळा. हट्टाने देणग्या ’घेतल्या’ जातात. मोठे मोठे स्पिकर्स आणुन ढणढण गाणी लावायची आणि त्यावर नाचायचे. शेजारी पाजारी वृद्ध लोक असतील लहान बाळे असतील त्याचा काहीही विचारच नाही. ह्या सगळ्यात आपण गणपतीची पुजा करतो म्हणजे काय करतो, कशासाठी करतो ह्याचा सारासार विचार तरी केला जातो की नाही माहीत नाही. ह्या मंडळांचे जे कोणी कार्यकर्ते असतात त्यांना नोक~या, शाळा, कॉलेजेस वगैरे तरी असतात की नाही हे तो गणपतीबप्पाच जाणे!
एकुणच सगळ्याला खुप बाजारु स्वरुप आलेय. सगळ्या नवीन ’साधु-संताना’ आपल्या प्रवचनांच्या पानपान भरुन जाहीराती कराव्या लागतात. कित्येकांच्या अंगावर प्रचंड दागदागीने, भरजरी साड्या वगैरे दिसतात. पुर्वीचे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अक्कलकोट महाराज, वगैरे जे होऊन गेले त्यांचा साधेपणा हाच त्यांचा दागीना वाटायचा. हे कधी आणि कसे बदलले? खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कित्येक रुपये खर्च करुन लोक तिरुपतीला जातात तिथे ताटकळत उभे रहातात अक्षरशः १ मिनीटापुरते दर्शन मिळते त्यासाठी इतका अट्टाहास का? जी गोष्ट बालाजीची तिच गोष्ट कोल्हापुरच्या अंबाबाईची. गेले ३-४ वर्षे मी कोल्हापुरला जाऊन देवळात गेले नाहीये का? तर इतकी गर्दी आणि चो~या मा~या हेच नित्याचे. लोक खरोखर अचानक इतके देवभक्त झाले का? कळत नाही. गेल्यावर्षी तिरुपतीप्रमाणे पंढरपूरला देखील पैसे देवुन लगेच दर्शन मिळण्याची वेगळी रांग चालु केली होती अजुनही आहे की नाही माहीती नाही. पण वारीबरोबर येणारे भक्तगण तिष्ठत त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी उन्हा-पावसाचे ताटकळत उभे असताना कोणी धनवंत फक्त धनाच्याच बळावर स्वत:च्या गाडीतुन येउन दर्शन घेउन जाणार हे चित्र प्रचंड संतापदाय़ी आहे.
माझा देवावर विश्वास आहे. तोच माझा पाठीराखा आहे ह्याबद्दल माझी खात्री देखील आहे. पण त्याचे हे असले अवडंबर झालेले मनाला पटतच नाही. हे कुठेतरी बदलले पाहीजे. बदलण्यासाठी एखाद्या लोकमान्यांची, फुले, अंबेडकरांचीच आज आपल्या समाजाला गरज आहे.
(ही माझी वैयक्तीक मते आहेत त्याचा कृपया अन्य गोष्टीशी संबंध लावु नये ही विनंती)
लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव चालु केला होता त्याच कारणाने अजुनही चालु ठेवावा असे मला अज्जीबात वाटत नाही पण त्याला आलेले प्रचारकी म्हणा किंवा बाजारु जे स्वरुप आहे ते कोठेतरी खटकते. गल्लोगल्ली असलेली गणेश मंडळे आहेत ती नक्की काय कामे करतात? त्या गल्लीतला गुंडच त्याचा प्रमुख असतो बरेचवेळा. हट्टाने देणग्या ’घेतल्या’ जातात. मोठे मोठे स्पिकर्स आणुन ढणढण गाणी लावायची आणि त्यावर नाचायचे. शेजारी पाजारी वृद्ध लोक असतील लहान बाळे असतील त्याचा काहीही विचारच नाही. ह्या सगळ्यात आपण गणपतीची पुजा करतो म्हणजे काय करतो, कशासाठी करतो ह्याचा सारासार विचार तरी केला जातो की नाही माहीत नाही. ह्या मंडळांचे जे कोणी कार्यकर्ते असतात त्यांना नोक~या, शाळा, कॉलेजेस वगैरे तरी असतात की नाही हे तो गणपतीबप्पाच जाणे!
एकुणच सगळ्याला खुप बाजारु स्वरुप आलेय. सगळ्या नवीन ’साधु-संताना’ आपल्या प्रवचनांच्या पानपान भरुन जाहीराती कराव्या लागतात. कित्येकांच्या अंगावर प्रचंड दागदागीने, भरजरी साड्या वगैरे दिसतात. पुर्वीचे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अक्कलकोट महाराज, वगैरे जे होऊन गेले त्यांचा साधेपणा हाच त्यांचा दागीना वाटायचा. हे कधी आणि कसे बदलले? खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कित्येक रुपये खर्च करुन लोक तिरुपतीला जातात तिथे ताटकळत उभे रहातात अक्षरशः १ मिनीटापुरते दर्शन मिळते त्यासाठी इतका अट्टाहास का? जी गोष्ट बालाजीची तिच गोष्ट कोल्हापुरच्या अंबाबाईची. गेले ३-४ वर्षे मी कोल्हापुरला जाऊन देवळात गेले नाहीये का? तर इतकी गर्दी आणि चो~या मा~या हेच नित्याचे. लोक खरोखर अचानक इतके देवभक्त झाले का? कळत नाही. गेल्यावर्षी तिरुपतीप्रमाणे पंढरपूरला देखील पैसे देवुन लगेच दर्शन मिळण्याची वेगळी रांग चालु केली होती अजुनही आहे की नाही माहीती नाही. पण वारीबरोबर येणारे भक्तगण तिष्ठत त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी उन्हा-पावसाचे ताटकळत उभे असताना कोणी धनवंत फक्त धनाच्याच बळावर स्वत:च्या गाडीतुन येउन दर्शन घेउन जाणार हे चित्र प्रचंड संतापदाय़ी आहे.
माझा देवावर विश्वास आहे. तोच माझा पाठीराखा आहे ह्याबद्दल माझी खात्री देखील आहे. पण त्याचे हे असले अवडंबर झालेले मनाला पटतच नाही. हे कुठेतरी बदलले पाहीजे. बदलण्यासाठी एखाद्या लोकमान्यांची, फुले, अंबेडकरांचीच आज आपल्या समाजाला गरज आहे.
(ही माझी वैयक्तीक मते आहेत त्याचा कृपया अन्य गोष्टीशी संबंध लावु नये ही विनंती)
Tuesday, August 28, 2007
ऐलतीर-पैलतीर
दोन आठवड्यापुर्वी मिशन पीक ला जाण्याचा पराक्रम केला आणि येताना उतारावर दगडांवरुन पाय सटकुन पडले इतके की ९११ ल फोन करुन त्यांच्या मदतीने राहीलेले अंतर खाली यावे लागले. ते पडणे इतके मोठे निघाले की आता पायाला ६ आठवडे प्लास्टर घालुन बसणे एवढाच उपाय होता. तर सध्या अस्मादीक कुबड्या घेउन कसे चालावे ह्याचे प्रशिक्षण घेत आहेत!
घरी (म्हणजे देशात) रोजचे फोन चालु आहेत. इथे मला मदतीला कोणी नाही म्हणुन घरचे हळहळताहेत आणि त्यांची आठवण येउन माझ्या डोळ्यातले पाणी ओसरत नाहीये. इथे रहाताना घरच्यांची आठवण न होता दिवस पुढे सरकत नाहीत
आणि तिथे गेले की इथल्या काळज्या मनातुन जात नाहीत. एकुण हे द्वंद्व प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात चालु असते. तिकडुन मदतीला लगेचच कोणी येउ शकेल ही परीस्थीती नाहीये. इथल्या मैत्रीणी आपापल्या भागादौडीने थकलेल्या! मला येउन मदत करण्याची त्यांची कितीही इच्छा असेल तरीही ते शक्य होत नाही. ह्या सगळ्या परीस्थीतीमधे ’आपण भारतात असतो तर’ हा विचार उचल खातो. देशात असते तर घरुन कोणीही निश्चीत आले असते मदतीला हे नक्कीच कारण पासपोर्ट, व्हीसा, थंडी, भाषा असल्या गोष्टीचा त्रास नसता झाला. आले मनात की तिकीट काढुन आले इतके ते सोपे होते. डॉक्टरशी समोरासमोर बसुन पाहीजे तितके प्रश्ण विचारता आले असते. रात्री-अपरात्री गरज लागली तर कदाचीत डॊक्टरने फोन उचलुन मदतही केली असती. येवढ्या सगळ्या जमेच्या बाजु आहेत! मग आपण इथे काय करतोय? कशासाठी इथे रहातो? पैसा? मान-मरातब? सुखसोयी? पैसा आहे पण रोजचे घरचे काम आपले आपणच करावे लागते. अगदी कितीही कंटाळा आला तरी भांडी घासणे, केर, स्वयंपाक हे सगळे आपले आपणच बघावे लागते. भाजीपाला, किराणा सामान आपले आपणच घरात आणावे लागते.
पण हवेचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण नाही. शनिवार रविवार सुट्टी अपल्याला आवडते ते शिकण्यात घालवता येते. शिक्षण पुढे चालु ठेवता येते. मुलांसाठी सुसज्ज पाळणाघरे आहेत आणि तिथे मुलांची आबाळ होणार नाही ह्याची खात्री असते. जात-पात, धर्माच्या नावावर चालणारे दंगे नाहीत. रोजच्या व्यवहारात तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागत नाही. सामाजीक समानता जाणवते. तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात तुम्हाला आयकर द्यावाच लागतो. एखाद्या कागदपत्रासठी उगीचच अडवणुक केली जात नाही. रस्ते, पाणी, वीज, वहातुक ह्यासारख्या रोजच्या गरजांसाठी धावपळ करावी लागत नाही.
एकीकडे राहीले तर घरचे सगळे जवळ आहेत पण रोजच्या जगण्यासठी कराव्या लागणा~या लढाईत आपण जगणेच विसरुन जाउ की काय अशी भीती आहे. दुसरीकडे सुसज्ज सोयीनी जगताना घरच्यांपासुन, आपल्या देशापासुन, आपल्या मुळांपासुन फ़ारकत घेतोय की काय अशी भीती आहे.
ऐलतीरी राहायचे की पैलतीरी हया प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार, परीस्थीतीनुसार, घ्यायचे असते, घेतलेलेही असते.
घरी (म्हणजे देशात) रोजचे फोन चालु आहेत. इथे मला मदतीला कोणी नाही म्हणुन घरचे हळहळताहेत आणि त्यांची आठवण येउन माझ्या डोळ्यातले पाणी ओसरत नाहीये. इथे रहाताना घरच्यांची आठवण न होता दिवस पुढे सरकत नाहीत
आणि तिथे गेले की इथल्या काळज्या मनातुन जात नाहीत. एकुण हे द्वंद्व प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात चालु असते. तिकडुन मदतीला लगेचच कोणी येउ शकेल ही परीस्थीती नाहीये. इथल्या मैत्रीणी आपापल्या भागादौडीने थकलेल्या! मला येउन मदत करण्याची त्यांची कितीही इच्छा असेल तरीही ते शक्य होत नाही. ह्या सगळ्या परीस्थीतीमधे ’आपण भारतात असतो तर’ हा विचार उचल खातो. देशात असते तर घरुन कोणीही निश्चीत आले असते मदतीला हे नक्कीच कारण पासपोर्ट, व्हीसा, थंडी, भाषा असल्या गोष्टीचा त्रास नसता झाला. आले मनात की तिकीट काढुन आले इतके ते सोपे होते. डॉक्टरशी समोरासमोर बसुन पाहीजे तितके प्रश्ण विचारता आले असते. रात्री-अपरात्री गरज लागली तर कदाचीत डॊक्टरने फोन उचलुन मदतही केली असती. येवढ्या सगळ्या जमेच्या बाजु आहेत! मग आपण इथे काय करतोय? कशासाठी इथे रहातो? पैसा? मान-मरातब? सुखसोयी? पैसा आहे पण रोजचे घरचे काम आपले आपणच करावे लागते. अगदी कितीही कंटाळा आला तरी भांडी घासणे, केर, स्वयंपाक हे सगळे आपले आपणच बघावे लागते. भाजीपाला, किराणा सामान आपले आपणच घरात आणावे लागते.
पण हवेचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण नाही. शनिवार रविवार सुट्टी अपल्याला आवडते ते शिकण्यात घालवता येते. शिक्षण पुढे चालु ठेवता येते. मुलांसाठी सुसज्ज पाळणाघरे आहेत आणि तिथे मुलांची आबाळ होणार नाही ह्याची खात्री असते. जात-पात, धर्माच्या नावावर चालणारे दंगे नाहीत. रोजच्या व्यवहारात तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागत नाही. सामाजीक समानता जाणवते. तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात तुम्हाला आयकर द्यावाच लागतो. एखाद्या कागदपत्रासठी उगीचच अडवणुक केली जात नाही. रस्ते, पाणी, वीज, वहातुक ह्यासारख्या रोजच्या गरजांसाठी धावपळ करावी लागत नाही.
एकीकडे राहीले तर घरचे सगळे जवळ आहेत पण रोजच्या जगण्यासठी कराव्या लागणा~या लढाईत आपण जगणेच विसरुन जाउ की काय अशी भीती आहे. दुसरीकडे सुसज्ज सोयीनी जगताना घरच्यांपासुन, आपल्या देशापासुन, आपल्या मुळांपासुन फ़ारकत घेतोय की काय अशी भीती आहे.
ऐलतीरी राहायचे की पैलतीरी हया प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार, परीस्थीतीनुसार, घ्यायचे असते, घेतलेलेही असते.
Wednesday, July 18, 2007
अविनाश धर्माधिकारी
गेल्या शनिवारी अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यांचा हा बे एरीया मधला तिसरा कार्यक्रम आणि मला हे तिनही कार्यक्रम पहायचा आणि ऐकायचा योग आला. मला हा कार्यक्रम तितकासा आवडला नाही कारण नसलेले नाविन्य! आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रामात दिसणा~या सर्व चुका परत एकदा दिसल्या. जवळपास ३०% लोक लहान मुलाना घेऊन आले होते आणि त्यांची रडगाणी सतत चालु होती आणि आईवडीलांजवळ थोडीसुद्धा courtsey नव्हती की आपल्यामुळे लोकाना त्रास होतोय तर बाहेर घेउन जावे. महाराष्ट्र मंडळाची निवेदिका बोलताना आपण घरगुती गप्पा मारतोय ह्या पद्धतीने निवेदन करत होती. शेवटी म.मं.च्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी ह्यावर्षीच्या सगळ्या कार्यक्रमांची जाहीरात करुन घेतली!
आता थोडे भाषणाविषयी! धर्माधीकारींचे स्वत:चे कार्य, व्यक्तीमत्व इतके मोठे आहे की त्याविषयी कधीही ऐकायला कंटाळा येत नाही. पण हा कार्यक्रम न आवडण्याचे मुख्य कारण असे की जाहीरात करताना २०२० चा भारत अशी केली होती आणि त्याबद्दल एकही वाक्य ते बोलले नाहीत. त्यांना न विचारताच कार्यक्रमाचे नाव जाहीर केले होते की काय अशी शंका आली. सुरुवात करताना त्यांनि असे जाहीर केले होते की शेवटी चर्चेसाठी वेळ राखून ठेवण्यात येईल पण तेवढा वेळच पुरला नाही. शेवटी ३ लोकानी चाणक्य मंडळाच्या कार्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय हे कळले नाही. ते जे बोलले त्यातले मला जवळपास ४०% आधीच्या भाषणांमुळे, त्यांच्याबद्दल इतर कुठे वाचल्यामुळे माहीती होते. परत ऐकण्यात स्वारस्य नव्हते असे नाही पण नवीन ऐकायला जास्त आवडले असते. या माणसाचे कार्य प्रचंड आहे आणि आधी केले मग सांगीतले असे असल्याने प्रभाव जस्ती पडतो हे पण तितकेच खरे. स्वत:च्या कामावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि स्वत:चे कठोर परीक्षण करण्याची बुद्धी आहे. ३ वर्षांपुर्वी ते आलेले असताना त्यांनी भारताचा स्वयंपूर्णतेकडे होणारा प्रवास उदाहरणे देउन सांगितलेले आठवतेय. त्यापद्धतीने ते बोलले असते तर ते जास्त सयुक्तीक ठरले असते. हे भाषण आनंद निश्चीत देउन गेले, दुपारी घरी डुलक्या घेण्यापेक्षा काहीतरी चांगले ऐकल्याचे समाधान मिळाले. आणि इतर देशातुन येणा~या वक्त्यांपेक्षा त्यांचा ’तुम्ही इथे राहुनही आपल्या देशासाठी काहीतरी करु शकता’ हा दिलासादायक सुर पण आवडला. आणि इथे रहातो म्हणुन खिल्ली उडवणे, इथे येउन फ़क्त मदतीची अपेक्षा न करणे हेही वेगळे जाणावले.
शेवटी बाहेर पडल्यावर जाणवलेले आणि अजुनही सतत जाणवत रहाते ते म्हणजे ह्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या देशाबद्दलची श्रद्धा, देश एक महासत्ता होऊ शकेल हे स्वप्न उराशी बाळगुन आपण त्यादृष्टीने काय करु शकतो ह्याची जाणीव करुन देणारा प्रचंड आशावाद, कार्यकर्ता कसा असावा ह्याबद्दलची स्पष्ट आणि पडखर मते. आपल्या कार्याबद्दलची आत्मीयता आणि तळमळ. या आणि कदाचीत फ़क्त याच कारणांसाठी कदाचीत मी कित्येकवेळा हा कार्यक्रम पहायला-ऐकायला जाईन.
आता थोडे भाषणाविषयी! धर्माधीकारींचे स्वत:चे कार्य, व्यक्तीमत्व इतके मोठे आहे की त्याविषयी कधीही ऐकायला कंटाळा येत नाही. पण हा कार्यक्रम न आवडण्याचे मुख्य कारण असे की जाहीरात करताना २०२० चा भारत अशी केली होती आणि त्याबद्दल एकही वाक्य ते बोलले नाहीत. त्यांना न विचारताच कार्यक्रमाचे नाव जाहीर केले होते की काय अशी शंका आली. सुरुवात करताना त्यांनि असे जाहीर केले होते की शेवटी चर्चेसाठी वेळ राखून ठेवण्यात येईल पण तेवढा वेळच पुरला नाही. शेवटी ३ लोकानी चाणक्य मंडळाच्या कार्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय हे कळले नाही. ते जे बोलले त्यातले मला जवळपास ४०% आधीच्या भाषणांमुळे, त्यांच्याबद्दल इतर कुठे वाचल्यामुळे माहीती होते. परत ऐकण्यात स्वारस्य नव्हते असे नाही पण नवीन ऐकायला जास्त आवडले असते. या माणसाचे कार्य प्रचंड आहे आणि आधी केले मग सांगीतले असे असल्याने प्रभाव जस्ती पडतो हे पण तितकेच खरे. स्वत:च्या कामावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि स्वत:चे कठोर परीक्षण करण्याची बुद्धी आहे. ३ वर्षांपुर्वी ते आलेले असताना त्यांनी भारताचा स्वयंपूर्णतेकडे होणारा प्रवास उदाहरणे देउन सांगितलेले आठवतेय. त्यापद्धतीने ते बोलले असते तर ते जास्त सयुक्तीक ठरले असते. हे भाषण आनंद निश्चीत देउन गेले, दुपारी घरी डुलक्या घेण्यापेक्षा काहीतरी चांगले ऐकल्याचे समाधान मिळाले. आणि इतर देशातुन येणा~या वक्त्यांपेक्षा त्यांचा ’तुम्ही इथे राहुनही आपल्या देशासाठी काहीतरी करु शकता’ हा दिलासादायक सुर पण आवडला. आणि इथे रहातो म्हणुन खिल्ली उडवणे, इथे येउन फ़क्त मदतीची अपेक्षा न करणे हेही वेगळे जाणावले.
शेवटी बाहेर पडल्यावर जाणवलेले आणि अजुनही सतत जाणवत रहाते ते म्हणजे ह्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या देशाबद्दलची श्रद्धा, देश एक महासत्ता होऊ शकेल हे स्वप्न उराशी बाळगुन आपण त्यादृष्टीने काय करु शकतो ह्याची जाणीव करुन देणारा प्रचंड आशावाद, कार्यकर्ता कसा असावा ह्याबद्दलची स्पष्ट आणि पडखर मते. आपल्या कार्याबद्दलची आत्मीयता आणि तळमळ. या आणि कदाचीत फ़क्त याच कारणांसाठी कदाचीत मी कित्येकवेळा हा कार्यक्रम पहायला-ऐकायला जाईन.
Subscribe to:
Posts (Atom)