संवेदचा कवितांचा खो एकदा धाडसाने(!) परतवुन लावला तर गिरीने दिलाच. माझे कवितांचे वाकडे अजिबात नाही. साध्या सोप्या कवीता कळतात देखील. पण कवितांची भीती का आणि कशी बसली माहिती नाही. तरी आवडलेल्या दोन(च) कवीता इथे देतेय. त्याआधी संवेदने लिहिलेले नियम परत डकवते इथे -
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
१. गवतफुला -
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला
मलाही वाटते लहान लहान होऊनी तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे विसरुनी शाळा घर सारे
तुझी गोजीरी शिकुन भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या
आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगीत कपडे फुलापाखरा फसवावे
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
~ शांता शेळके.
२. नको नको रे पावसा -
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥
नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥
नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥
आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥
किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥
वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥
आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥
पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥
-- इंदिरा संत
माझा खो स्वाती अंबोळे आणि उपासला ...
(दो से मेरा क्या होगा! हा सिंड्रोम मला होईल असे अजिबात वाटले नव्हते. पण झाले तेव्हा प्रचंड आनंद झाला!)
Wednesday, August 27, 2008
Sunday, June 08, 2008
Why Raw?
मागच्या एका पोस्टमधे मी Raw Food खात होते असा उल्लेख होता. त्यावर ब-याच लोकानी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तरे द्यायचा हा छोटासा प्रयत्न. ही मझी स्वत:ची मते आहे. तुम्हाला स्वत:वर यातले काहीही प्रयोग करायचे असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत. Mints याबाबतीत कशासही जबाबदार नाही.
मी David Wolfe या raw Foodist च्या सेमिनार ला गेले होते. त्याची यामागची भूमिका बरीचशी अशी आहे -
१. शाकाहार हाच मानवाचा मूळ आहार आहे. मानवाचे दात, सुळे, दाढा मांस भक्षणासाठी तयार झालेल्या नाहीत. तसेच शरिरात तयार होणारे पचनरस हे शाकाहारासाठी योग्य असेच तयार होतात. शाकाहार याचा अर्थ प्राणीजन्य पदार्थ जसे दूध, दूधापासुन तयार होणारे पदार्थ, मध, मासे, कोणत्याही प्रकारचे मांस हे शरीरास कोणतेही जीवनावश्यक घटक पुरवत नाही. Calcium, Vitamin D वगैरे घातलेले दूध बाजारात मिळते आणि ते शरीराला कसे चांगले आहे याचा बराच प्रचारही केलेला आढळतो. तसेच या प्राण्यांचे दूध आणि मांसासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीने torture केले जाते तो भागही किती un-humane आहे हे आपण संगीताच्या ब्लॉगमधे वाचले आहेच.
२. पदार्थ घेताना शक्यतो organic घ्यावेत. किटकनाशके, जंतुनाशके, अनेक प्रकारची रासायनीक खते वापरल्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळे यामधले बरेचसे जीवनावश्यक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळत नाहीत.
३. आधीच असा किटकनाशकांनी भरलेला, खतांवर वाढलेला भाजीपाला पुढे शिजवला तर त्यातली शिल्लक राहीलेली जीवनसत्वे नष्ट होतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याचा शरीरला पोषणाच्या द्रुष्टीने काहीही उपयोग होत नाही.
४. ११५ डिग्री फॅरेनहाईट्च्यापुढे तापवलेले अन्न हे शिजवलेले अन्न समजले जाते. या तापमानापर्यन्त कच्च्या पदार्थामधील घटकद्रव्ये टिकून रहातात.
५. कोणत्याही प्रकारचे तेल जर 'Expeller Process' ने काढले असेल तर त्यामधले जीवनसत्व टिकून रहाते. व्यावसायीक जे तेल काढले जाते ते 'solvent based extraction या पद्धतीने काढले जाते. या पद्धतीमधे बरीच हानिकारक द्रव्ये तेलामधे मिसळली जातात. त्यामुळे तेल दुकानामध्ये अनेक दिवस राहिले तरी खराब होत नाही. पण त्यामधे मिसळलेल्या अनेक प्रकारच्या stabilizers आणि solvents मुळे शरिराला अपाय होऊ शकतो.
६. या सर्व कारणांमुळे नैसर्गीकरित्या वाळवलेले पदार्थ जसे फळांच्या काप, वेगवेगळ्या तैलबीया खाणे हे शरिरासाठी अत्यंत पोषक समजले जाते.
७. बाजारात ज्याप्रकारचे चॉकलेट व कॉफी मिळते ती भाजलेली असल्यामुळे त्यातले उपयोगी घटकपदार्थ नष्ट झालेले असतात. त्यावर त्यात लोणी साखर मिसळल्यामुळे त्याच्यामुळे होणारी शरिराची हानी ही अनेकपटीनी अधीक असते.
८. मका, गहु, सोयाबीन हे धान्य पिकवताना खूप प्रकारची खते, किटकनाशके वापरली जातात. तसेच कापणी केल्यावर ते धान्य अधीक काळ टिकावे याकरिताही त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसींग होते. त्यामुळे या प्रकारच्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे शरिराला हानी पोहोचते.
यापुढेही जाऊन शरीरासाठी आवश्यक असणारे Calcium आम्ही कसे आणि मिळवायचे हा प्रश्न येतोच. त्यासाठी David Wolfe यांच्याकडून मिळालेले उत्तर याप्रमाणे - 'ब-याच पालेभाज्यांमधे आणि बदाम, आक्रोड यामधे शरीराला आवश्यक तेवढे calcium मिळते. वरून मिसळलेले calcium शरीरातून बाहेर टाकले जाते. त्यामुळे दूधामुळे शरीराला calcium मिळते हा समज चुकीचा आहे. '
याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. माझा याबद्दलचा अभ्यासही अतिशय तोकडा आहे. अधीक माहितीसाठी खालील पुस्तके वाचावीत -
Sunfood Diet Success System
The Raw Transformation: Energizing Your Life with Living Foods
Eating For Beauty
तुम्हाला जर कच्चे पदार्थ खायला सुरुवात करायची असेल तर प्रथम प्राणीजन्य पदार्थ खाणे बंद करावे. साखर, गूळ यासारखे पदार्थ बंद करावेत. त्यानन्तर शिजवलेले अन्न कमीकमी करत जाऊन कच्च्या पदार्थांचे जेवणातले प्रमाण वाढवत जावे. १००% बदल पहिल्यदिवशी करण्यापेक्षा हळुहळू केलेला बदल दीर्घकालीन यश देणारा असतो.
माझ्या Raw Recipes इथे मिळतील -
Mints' Raw Recipes
मी खालील पुस्तके रेसीपीसाठी वापरते -
Raw: The Uncook Book: New Vegetarian Food for Life
Raw
मी David Wolfe या raw Foodist च्या सेमिनार ला गेले होते. त्याची यामागची भूमिका बरीचशी अशी आहे -
१. शाकाहार हाच मानवाचा मूळ आहार आहे. मानवाचे दात, सुळे, दाढा मांस भक्षणासाठी तयार झालेल्या नाहीत. तसेच शरिरात तयार होणारे पचनरस हे शाकाहारासाठी योग्य असेच तयार होतात. शाकाहार याचा अर्थ प्राणीजन्य पदार्थ जसे दूध, दूधापासुन तयार होणारे पदार्थ, मध, मासे, कोणत्याही प्रकारचे मांस हे शरीरास कोणतेही जीवनावश्यक घटक पुरवत नाही. Calcium, Vitamin D वगैरे घातलेले दूध बाजारात मिळते आणि ते शरीराला कसे चांगले आहे याचा बराच प्रचारही केलेला आढळतो. तसेच या प्राण्यांचे दूध आणि मांसासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीने torture केले जाते तो भागही किती un-humane आहे हे आपण संगीताच्या ब्लॉगमधे वाचले आहेच.
२. पदार्थ घेताना शक्यतो organic घ्यावेत. किटकनाशके, जंतुनाशके, अनेक प्रकारची रासायनीक खते वापरल्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळे यामधले बरेचसे जीवनावश्यक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळत नाहीत.
३. आधीच असा किटकनाशकांनी भरलेला, खतांवर वाढलेला भाजीपाला पुढे शिजवला तर त्यातली शिल्लक राहीलेली जीवनसत्वे नष्ट होतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याचा शरीरला पोषणाच्या द्रुष्टीने काहीही उपयोग होत नाही.
४. ११५ डिग्री फॅरेनहाईट्च्यापुढे तापवलेले अन्न हे शिजवलेले अन्न समजले जाते. या तापमानापर्यन्त कच्च्या पदार्थामधील घटकद्रव्ये टिकून रहातात.
५. कोणत्याही प्रकारचे तेल जर 'Expeller Process' ने काढले असेल तर त्यामधले जीवनसत्व टिकून रहाते. व्यावसायीक जे तेल काढले जाते ते 'solvent based extraction या पद्धतीने काढले जाते. या पद्धतीमधे बरीच हानिकारक द्रव्ये तेलामधे मिसळली जातात. त्यामुळे तेल दुकानामध्ये अनेक दिवस राहिले तरी खराब होत नाही. पण त्यामधे मिसळलेल्या अनेक प्रकारच्या stabilizers आणि solvents मुळे शरिराला अपाय होऊ शकतो.
६. या सर्व कारणांमुळे नैसर्गीकरित्या वाळवलेले पदार्थ जसे फळांच्या काप, वेगवेगळ्या तैलबीया खाणे हे शरिरासाठी अत्यंत पोषक समजले जाते.
७. बाजारात ज्याप्रकारचे चॉकलेट व कॉफी मिळते ती भाजलेली असल्यामुळे त्यातले उपयोगी घटकपदार्थ नष्ट झालेले असतात. त्यावर त्यात लोणी साखर मिसळल्यामुळे त्याच्यामुळे होणारी शरिराची हानी ही अनेकपटीनी अधीक असते.
८. मका, गहु, सोयाबीन हे धान्य पिकवताना खूप प्रकारची खते, किटकनाशके वापरली जातात. तसेच कापणी केल्यावर ते धान्य अधीक काळ टिकावे याकरिताही त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसींग होते. त्यामुळे या प्रकारच्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे शरिराला हानी पोहोचते.
यापुढेही जाऊन शरीरासाठी आवश्यक असणारे Calcium आम्ही कसे आणि मिळवायचे हा प्रश्न येतोच. त्यासाठी David Wolfe यांच्याकडून मिळालेले उत्तर याप्रमाणे - 'ब-याच पालेभाज्यांमधे आणि बदाम, आक्रोड यामधे शरीराला आवश्यक तेवढे calcium मिळते. वरून मिसळलेले calcium शरीरातून बाहेर टाकले जाते. त्यामुळे दूधामुळे शरीराला calcium मिळते हा समज चुकीचा आहे. '
याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. माझा याबद्दलचा अभ्यासही अतिशय तोकडा आहे. अधीक माहितीसाठी खालील पुस्तके वाचावीत -
Sunfood Diet Success System
The Raw Transformation: Energizing Your Life with Living Foods
Eating For Beauty
तुम्हाला जर कच्चे पदार्थ खायला सुरुवात करायची असेल तर प्रथम प्राणीजन्य पदार्थ खाणे बंद करावे. साखर, गूळ यासारखे पदार्थ बंद करावेत. त्यानन्तर शिजवलेले अन्न कमीकमी करत जाऊन कच्च्या पदार्थांचे जेवणातले प्रमाण वाढवत जावे. १००% बदल पहिल्यदिवशी करण्यापेक्षा हळुहळू केलेला बदल दीर्घकालीन यश देणारा असतो.
माझ्या Raw Recipes इथे मिळतील -
Mints' Raw Recipes
मी खालील पुस्तके रेसीपीसाठी वापरते -
Raw: The Uncook Book: New Vegetarian Food for Life
Raw
Monday, April 14, 2008
रात्र थोडी आणि सोंगे फार ...
काल माझ्या एकुणच स्वभावाचा, रोजच्या दिनक्रमाचा कामाचा वगैरे आढावा घेत होते. आणि मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन दिसणार्या कामात रस घेणे हा मला असलेला अवगुण! हो अवगुणाच!
भरतकाम करायची आवड म्हणुन मग एक मोठे काम हातात घेतलेय ते आठवड्यातुन एकदा-दोनदा हातात घेउन बसते. वाचनाची आवड आहे म्हणुन मग एक इंग्लिश, एक मराठी अशी किमान २ पुस्तके माझ्या टेबलवर सापडतील. स्वयंपाकाची आवड म्हणुन मग त्याचे फोटो, अर्ध्या आधिक लिहिलेल्या रेसिपीज लॅपटॉपवर सेव्ह केलेल्या. आठवड्यातुन किमान एकदा तरी कुंभारकाम करुन आणलेली भांडी! घर सजवायचे म्हणुन कोणते पेंटींग करायचे वगैरे ठरवत आणलेले थोडेफ़ार सामान. बागकाम सुरु केलेले आहे म्हणुन मग वेगवेगळ्या बिया, कंद, कुणाकुणाकडुन आणुन लावलेल्या कसल्या कसल्या फांद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या वापरायच्या म्हणुन सुरु केलेल्या शोधानी भरलेले बुकमार्क्स. कुठल्या कुठल्या नाटकाच्या/ नाचाच्या कार्यक्रमाना तोंडे रंगवायला मदत करायला जाउन संपून जात आसलेले वीकेंड्स. आवडते म्हणुन पुस्तकाच्या दुकाना/ग्रंथालयाना भेटी देउन आणलेली पुस्तके नीट वर्गवरी करायची म्हणुन आणलेले शेल्फ. ब्लॉग वाचुन त्यावर लिहिलेल्या कॉमेंटस. फोतोग्राफीची आवड म्हणुन जमवलेले सामान.
रोजचे ऑफिसचे आणि घरचे काम वेगळेच!
अता वाटतेय की थोडे bead work शिकले पाहीजे. त्याच्वेळेला असेही वाटते की आपण कुठेतरी बहेर्गावी जाऊन सुट्ट्यांचा आनंद पण मिळवला पाहीजे! या सगळ्याला कुठेतरी वेळ मिळाला पाहीजे. ठोडक्यात काय माझे सध्या रात्र थोडी सोंगे फ़ार असेच चालु आहे.
त्याच्वेळेला हे कुठेतरी थांबवले पाहीजे हे देखील पटते. पण काय कमी करावे ते समजत नाही. त्यामुळे सध्या माझा फ़ूड ब्लॉग आणि भरत्काम व कुंभार्काम या गोष्टी सोडुन सगळ्या छंदाना थोडे दिवस विश्रांती देणार आहे. हा संकल्प कमीत कमी ६ महिने तरी पाळायचा विचार आहे. आता बघु कुठवर जमते ते.
भरतकाम करायची आवड म्हणुन मग एक मोठे काम हातात घेतलेय ते आठवड्यातुन एकदा-दोनदा हातात घेउन बसते. वाचनाची आवड आहे म्हणुन मग एक इंग्लिश, एक मराठी अशी किमान २ पुस्तके माझ्या टेबलवर सापडतील. स्वयंपाकाची आवड म्हणुन मग त्याचे फोटो, अर्ध्या आधिक लिहिलेल्या रेसिपीज लॅपटॉपवर सेव्ह केलेल्या. आठवड्यातुन किमान एकदा तरी कुंभारकाम करुन आणलेली भांडी! घर सजवायचे म्हणुन कोणते पेंटींग करायचे वगैरे ठरवत आणलेले थोडेफ़ार सामान. बागकाम सुरु केलेले आहे म्हणुन मग वेगवेगळ्या बिया, कंद, कुणाकुणाकडुन आणुन लावलेल्या कसल्या कसल्या फांद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या वापरायच्या म्हणुन सुरु केलेल्या शोधानी भरलेले बुकमार्क्स. कुठल्या कुठल्या नाटकाच्या/ नाचाच्या कार्यक्रमाना तोंडे रंगवायला मदत करायला जाउन संपून जात आसलेले वीकेंड्स. आवडते म्हणुन पुस्तकाच्या दुकाना/ग्रंथालयाना भेटी देउन आणलेली पुस्तके नीट वर्गवरी करायची म्हणुन आणलेले शेल्फ. ब्लॉग वाचुन त्यावर लिहिलेल्या कॉमेंटस. फोतोग्राफीची आवड म्हणुन जमवलेले सामान.
रोजचे ऑफिसचे आणि घरचे काम वेगळेच!
अता वाटतेय की थोडे bead work शिकले पाहीजे. त्याच्वेळेला असेही वाटते की आपण कुठेतरी बहेर्गावी जाऊन सुट्ट्यांचा आनंद पण मिळवला पाहीजे! या सगळ्याला कुठेतरी वेळ मिळाला पाहीजे. ठोडक्यात काय माझे सध्या रात्र थोडी सोंगे फ़ार असेच चालु आहे.
त्याच्वेळेला हे कुठेतरी थांबवले पाहीजे हे देखील पटते. पण काय कमी करावे ते समजत नाही. त्यामुळे सध्या माझा फ़ूड ब्लॉग आणि भरत्काम व कुंभार्काम या गोष्टी सोडुन सगळ्या छंदाना थोडे दिवस विश्रांती देणार आहे. हा संकल्प कमीत कमी ६ महिने तरी पाळायचा विचार आहे. आता बघु कुठवर जमते ते.
Friday, November 09, 2007
Thursday, October 04, 2007
जे जे उत्तम ...
नंदनने लिहायला चालु केले आणि आगावुपणाने लग्गेच सांगितले की टॅग का चालु करत नाही? मला अजीबात वाटले नव्हते की तो मनावर घेईल ;) पण तो नंदन आहे हे विसरले! आज स्वाती परत टॅग केले आणि अजुन लोकानी आठवण करुन द्यायच्या आत लिहावे म्हणुन बसले आणि आवडणारी सगळी पुस्तके समोर काढली आणि हे लिहु का ते असे काहीसे झाले.
नंदन ने हा उपक्रम सुरु करण्यासाठी ’पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन.’ असे साधे सोपे समीकरण देउनही ते आता कठीण वाटतेय :)
माझ्या अत्यंत आवडत्या उता-यांपैकी खालील एक उतारा -
धबधब्याजवळ पोचल्यावर अम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला कोण पाण्यात पळायला लागला. टुकण्या पाण्यातच बसुन राहीला. त्याने शर्ट काढुन टाकला होता. कणब्या रंगीत दगड गोळा करत होता. मुली फुले गोळा करत होत्या. मास्तरांनी कोट, टोपी काढुन धोतराचा काचा मारला होता. ते धबधब्यांच्या रांगेत उभे राहुन हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहीले. टोपी आणि कोट नसलेले, हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोरात पाऊस आला तेव्हा ते देवळाकडं पळाले नाहीत. आमच्याबरोबरच भिजत राहिले. मग वेलंगीबाईही धबधब्यांच्या रांगेत येउन उभ्या राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडं हिरवंगार होतं. आणि सगळीकडं भरुन राहीलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा, असं वाटत होतं.
पायाखालुन आणि वरुन वाहाणारं पाणी गुदगुल्या करुन पुढं जात होतं. इकडं तिकडं पळणारी मुलंमुली हळूहळू त्या धबधब्याच्या समोरच आली. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली. लोखंडीसाखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी, वेगळ्या वेगळ्या हसणा-या बोलणा-या आवाजांची साखळी. आम्ही वेगवेगळी मुलं नव्हतोच, तर आम्ही सगळी एकच आहोत, असं मॅड्सारखं वाटत होतं. वाहाणा-या पाण्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या हातात हात घालुन आम्ही कुठतरी निघालो आहोत, असं वाटत होतं. मधेच मॅड्सारखं पिवळंधमक ऊन पडलं. कुठं कुठं भरुन राहीलेलं पाणी अंगठीतल्या खड्यासार्खं चमकायला लागलं. माझ्या डाव्या हातात कुणाचा तरी हात होता. तो थोडासा टोचणारा हात जाउन नवाच कोणता तरी हात आला होता. न पहाताच असं वाटत होतं की हा हात ओळखीचा आहे. मी डावीकडं पाहिलं तर शेजारी सुमी उभी होती. तिनं माझा हात घट्ट पकडला होता. ती माझ्याकडं पाहुन हसत होती. पाण्याचे कितीतरी बारीक थेंब तिच्या केसांत अडकुन राहीले होते. ती माझ्या डोळ्यातच पहात होती. त्या हिरव्या रंगाच्या वासातूनही सुमीच्या केसांतील सोनटक्क्याच्या फुलांचा वास येत होता. खरं तर त्या सर्व हसण्याला आणि ओरडण्याला सोनटक्क्याच्या फुलांचा वासच असावा, असं वाटत होतं. माझ्या डोक्यात असला कही गोंधळ चालू असताना सुमी म्हणाली,
"किती छान आहे ना?"
मी मान हलवली.
-----------
साखळी, ’वनवास’ - प्रकाश नारायण संत
आता मी खालील लोकाना टॅग करते -
संवेद
सुमेधा
प्रियंभाषीणी
कृष्णाकाठ
परागकण
मी शक्यतो अत्तापर्यंत ज्यांना टॅग केले गेले नाही असे लोक शोधायचा प्रयत्न केलाय.
(P.S. सुमेधा आणि संवेद या दोघाना अजुन कोणीतरी तग केल्याचे दिसले. म्हणुन बदलते आहे. नवीन टॅग खालीलप्रमाणे -
शोनू
गायत्री)
नंदन ने हा उपक्रम सुरु करण्यासाठी ’पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन.’ असे साधे सोपे समीकरण देउनही ते आता कठीण वाटतेय :)
माझ्या अत्यंत आवडत्या उता-यांपैकी खालील एक उतारा -
धबधब्याजवळ पोचल्यावर अम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला कोण पाण्यात पळायला लागला. टुकण्या पाण्यातच बसुन राहीला. त्याने शर्ट काढुन टाकला होता. कणब्या रंगीत दगड गोळा करत होता. मुली फुले गोळा करत होत्या. मास्तरांनी कोट, टोपी काढुन धोतराचा काचा मारला होता. ते धबधब्यांच्या रांगेत उभे राहुन हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहीले. टोपी आणि कोट नसलेले, हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोरात पाऊस आला तेव्हा ते देवळाकडं पळाले नाहीत. आमच्याबरोबरच भिजत राहिले. मग वेलंगीबाईही धबधब्यांच्या रांगेत येउन उभ्या राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडं हिरवंगार होतं. आणि सगळीकडं भरुन राहीलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा, असं वाटत होतं.
पायाखालुन आणि वरुन वाहाणारं पाणी गुदगुल्या करुन पुढं जात होतं. इकडं तिकडं पळणारी मुलंमुली हळूहळू त्या धबधब्याच्या समोरच आली. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली. लोखंडीसाखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी, वेगळ्या वेगळ्या हसणा-या बोलणा-या आवाजांची साखळी. आम्ही वेगवेगळी मुलं नव्हतोच, तर आम्ही सगळी एकच आहोत, असं मॅड्सारखं वाटत होतं. वाहाणा-या पाण्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या हातात हात घालुन आम्ही कुठतरी निघालो आहोत, असं वाटत होतं. मधेच मॅड्सारखं पिवळंधमक ऊन पडलं. कुठं कुठं भरुन राहीलेलं पाणी अंगठीतल्या खड्यासार्खं चमकायला लागलं. माझ्या डाव्या हातात कुणाचा तरी हात होता. तो थोडासा टोचणारा हात जाउन नवाच कोणता तरी हात आला होता. न पहाताच असं वाटत होतं की हा हात ओळखीचा आहे. मी डावीकडं पाहिलं तर शेजारी सुमी उभी होती. तिनं माझा हात घट्ट पकडला होता. ती माझ्याकडं पाहुन हसत होती. पाण्याचे कितीतरी बारीक थेंब तिच्या केसांत अडकुन राहीले होते. ती माझ्या डोळ्यातच पहात होती. त्या हिरव्या रंगाच्या वासातूनही सुमीच्या केसांतील सोनटक्क्याच्या फुलांचा वास येत होता. खरं तर त्या सर्व हसण्याला आणि ओरडण्याला सोनटक्क्याच्या फुलांचा वासच असावा, असं वाटत होतं. माझ्या डोक्यात असला कही गोंधळ चालू असताना सुमी म्हणाली,
"किती छान आहे ना?"
मी मान हलवली.
-----------
साखळी, ’वनवास’ - प्रकाश नारायण संत
आता मी खालील लोकाना टॅग करते -
संवेद
सुमेधा
प्रियंभाषीणी
कृष्णाकाठ
परागकण
मी शक्यतो अत्तापर्यंत ज्यांना टॅग केले गेले नाही असे लोक शोधायचा प्रयत्न केलाय.
(P.S. सुमेधा आणि संवेद या दोघाना अजुन कोणीतरी तग केल्याचे दिसले. म्हणुन बदलते आहे. नवीन टॅग खालीलप्रमाणे -
शोनू
गायत्री)
Friday, September 14, 2007
गणपती बप्पा मोरया!
गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ते! येथे टिचकी मरा . अगदी स्टेप बाय स्टेप दिलेय मी.
मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.
मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.
Sunday, September 09, 2007
आई मला शाळेत जाऊ दे ...
सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.
शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.
नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...
पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!
आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.
शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.
नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...
पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!
आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.
Subscribe to:
Posts (Atom)